AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budhwar Upay: गणपतीला दुर्वा का अर्पण केल्या जातात? जाणून घ्या बुधवारचे सोपे उपाय

गणपतीला लाडू आवडतात हे सर्वांनाच माहित आहे, पण गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात आणि त्यामागील पौराणिक कथा काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

Budhwar Upay: गणपतीला दुर्वा का अर्पण केल्या जातात? जाणून घ्या बुधवारचे सोपे उपाय
गणपतीImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 18, 2023 | 8:45 AM
Share

मुंबई, बुधवार (Budhwar Upay) म्हणजे गणेशाचा दिवस मानला जातो. हिंदू धर्माची एक विशेष श्रद्धा आहे की, जर तुम्हाला कोणत्याही कामात काही अडथळे येत असतील, तर  विघ्नहर्त्याची विधीवत पूजा करा आणि त्याच्या आवडत्या गोष्टी लाडू आणि दूर्वा अर्पण करा. गणपतीला लाडू आवडतात हे सर्वांनाच माहित आहे, पण गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात आणि त्यामागील पौराणिक कथा काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी अनलासुर नावाचा राक्षस होता, त्याच्या भीतीमुळे स्वर्ग आणि पृथ्वीवर गोंधळ माजला होता. अनलासुर हा असा राक्षस होता, जो ऋषीमुनींना आणि मानवांना जिवंत गिळत असे. या राक्षसाच्या अत्याचाराने व्यथित होऊन सर्व देव-देवता, ऋषी-मुनी भगवान शंकराची प्रार्थना करण्यासाठी आले आणि सर्वांनी अनलासुराच्या दहशतीमुळे झालेला कहर नाहीसा करण्यासाठी भगवान शंकराची प्रार्थना केली.

मग महादेवाने सर्व देवता आणि ऋषींची प्रार्थना ऐकून त्यांना सांगितले की अनलासुर राक्षसाचा नाश फक्त गणेशच करू शकतो. भगवान शंकराचे म्हणणे ऐकून सर्व देवी-देवतांनी आणि ऋषीमुनींनी गणेशाची प्रार्थना केली, भगवान गणेशाने संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी अनलासुर राक्षसाला गिळले.  यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली.त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.

अशा प्रकारे वाहा दुर्वा

  1. गणपतीला दुर्वा अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवा.
  2. ज्या ठिकाणाहून दूर्वा मोडली जात आहे ती जागा स्वच्छ आणि नीटनेटकी असावी. तुम्ही बागेतून किंवा स्वच्छ जागेतून दुर्वा फोडू शकता.
  3. गणेशजींना नेहमी जोडीने दूर्वा अर्पण करावी. हे 11 किंवा 21 जोड्यांमध्ये असू शकते.
  4. दुर्वा वाहतांना गणेशाच्या मंत्रांचा जप करावा.

बुधवारी केलेल्या या उपायांमुळे होतात सर्व मनोकामना पुर्ण

  1. बुधवारी श्रीगणेशाची नियमित पूजा करावी. मनोभावे केलेल्या पूजे श्रीगणेश प्रसन्न होतात. या दिवशी त्यांना दुर्वा अर्पण केल्यास ते अधिक फलदायी ठरते. व्यवसायात आणि नोकरीत प्रगती थांबलेली असल्यास दर बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घ्यावे.
  2.  गणपतीला दुर्वा अर्पण करण्यासोबतच लाडूचा देखील नैवेद्य दाखविला जातो. लाडू त्यांना खूप प्रिय आहेत. लाडू अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि धनप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करतात.
  3. याशिवाय गणेशाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्याच्या मंदिरात जाऊन दर बुधवारी 5, 7 किंवा 11 परिक्रमा करा. हे 11 बुधवार सतत करा. लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागतील.
  4. बुधवारी तृतीयपंथीयांना काही पैसे दान करा आणि नंतर त्यांच्याकडून आशीर्वाद म्हणून काही पैसे घ्या. हे पैसे देवघरात किंवा हिरव्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.