AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti: जाणून घ्या चाणक्यांचे तीन खास सीक्रेट्स, आयुष्यात कधी अपयश येणार नाही

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याच्या आधारे जर तुम्ही तुमच्या आयुष्याचं नियोजन केलं तर तुम्हाला कधीच आयुष्यात अपयश येणार नाही, अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Neeti: जाणून घ्या चाणक्यांचे तीन खास सीक्रेट्स, आयुष्यात कधी अपयश येणार नाही
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2025 | 5:48 PM
Share

हजारो वर्षांपूर्वी चाणक्य यांनी असे काही सीक्रेट्स आणि नीती सांगितल्या आहेत, ज्याचा वापर करून जगातील कोणताही व्यक्ती आपली आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलू शकतो. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये ज्या नीती सांगितल्या आहेत, त्या केवळ फक्त मेहनत आणि वेळ यांच्या योग्य नियोजनापूरत्याच मर्यादीत नाहीयेत, तर त्या विचार योजना, आणि संयम यांचा योग्य ताळमेळ देखील साधतात.अनेक लोक प्रचंड मेहनत करतात, पैसाही कमावतात, मात्र तरी देखील त्यांच्या हातात पैसा टिकत नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वी होती तशीच राहते. मात्र तुम्ही जर आर्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीतींची आपल्या जीवनात अंमलबजावणी केली तर नक्कीच तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होऊ शकते. तुम्ही तुमच्या प्रत्येक कामात यशस्वी व्हाल, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

वेळ आणि पैशांचा सन्मान

चाणक्य म्हणतात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे,तो म्हणजे तुम्ही पैसा आणि वेळेचा सन्मान करायला शिका. वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनातील सर्वात अमूल्य असा ठेवा आहे, सोबतच ही गोष्ट देखील लक्षात घ्या, की या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे मर्यादीत आहेत. त्यामुळे तुम्ही या दोन गोष्टींचा योग्य पद्धतीनं नियोजन करून वापर केला तर नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही भविष्यकाळात ज्या योजना आखल्या आहेत, त्यांच्यापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला वेळ आणि पैशांचा योग्य ताळमेळ साधता आला पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

साधारण जीवनशैली

चाणक्य म्हणतात तुम्ही श्रीमंत लोक पहा ते कधीच आपल्या संपत्तीचा दिखावा करत नाहीत, त्यांची जीवनशैली ही खूप साधी असते. त्यांना आपल्या पैशांचं प्रदर्शन करायला आवडत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही देखील साधारण जीवनशैली ठेवा, आपल्या बाह्य दिखाव्यावर जास्त पैसा खर्च करण्याची गरज नाही, मात्र आपले विचार नेहमी उच्च असले पाहिजेत असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संयम

चाणक्य म्हणतात आयुष्यात सर्वात जास्त जर काही महत्त्वाचं असेल तर तो म्हणजे संयम, तुम्हाला जर एखाद्यावेळी अपयश आलं तर खचून जाऊ नका, आयुष्यात संयम ठेवा, कारण येणारी वेळ ही तुमची असते, मात्र त्यासाठी आयुष्यात संयम फार गरजेचा असतो, जर तुमच्याकडे संयम असेल तरच तुम्ही आयुष्यात प्रगती करू शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.