AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात हे संकेत मिळत असतील तर समजून जा, तुम्ही मोठ्या संकटात सापडणार आहात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात कोणतंही संकट हे अचानक येत नसतं, तर हे संकट येण्यापूर्वी व्यक्तीला काही छोटे-छोटे संकेत मिळत असतात, ते संकेत ओळखता आले पाहिजेत.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात हे संकेत मिळत असतील तर समजून जा, तुम्ही मोठ्या संकटात सापडणार आहात
चाणक्य नीती Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 28, 2025 | 8:16 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते विचार आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? येणाऱ्या संकटांचा सामना कसा करावा? तसेच आपल्यावर जर एखादं संकट येणार असेल तर त्याची चाहुल कशी ओळखावी? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात कोणतंही संकट असं अचानक येत नसतं, तर ते संकट येण्यापूर्वी काही संकेत देत असतं, हे संकेत जर आपल्याला ओळखता आले तर माणूस या संकटातून बाहेर पडू शकतो, किंवा संकट येण्यापूर्वीच काही उपाय करता येतात. चला तर मग जाणून घेऊयात हे संकेत नेमके कोणते आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

चाणक्य म्हणतात कधी-कधी तुमच्या आयुष्यात अशी वेळ येते की तुम्ही खूप कष्ट करता, पण तुम्हाला अपेक्षित फळ मिळत नाही. हा देखील एक मोठा संकेत असतो. जेव्हा तुम्हाला खूप कष्ट करून देखील फळ मिळत नाही, तेव्हा तुम्ही अचानक तुमचा संयम गमावून बसता, त्यामुळे मोठ्या संकटाला आमंत्रण मिळतं. मात्र अशावेळी हे संकेत ओळखून माणसानं संयम ठेवावा. ही वेळ तुमची नाही, हे ओळखावं आणि योग्य वेळ येताच पुन्हा निर्णय घ्यावा, तर तुम्हाला नक्की यश मिळेलं.

स्वार्थी, फसवणूक करणारे लोक – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या आयुष्यात स्वार्थी आणि विश्वासघात करणाऱ्या लोकांची गर्दी होऊ लागते, तेव्हा हा संकेत तुम्ही वेळीच ओळखा, हे तुमच्यावर येणाऱ्या भविष्यातील संकटाचे संकेत असतात. अशा लोकांपासून नेहमी सावध रहा. या लोकांना जेवढं शक्य होईल तेवढं दूर ठेवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

गृह कलह- चाणक्य म्हणतात जेव्हा कोणतंही कारण नसताना तुमच्या घरात गृहकलह वाढतो, तेव्हा समजून जा की हे एका फार मोठ्या संकटाचे संकेत आहेत. तुम्ही जर वेळीच सावध झालात, आणि यातून बाहेर पडलात तर अशा संकटातून तुम्ही वाचू शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....