AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात हे संकेत मिळत असतील तर समजून जा, तुम्ही मोठ्या संकटात सापडणार आहात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात कोणतंही संकट हे अचानक येत नसतं, तर हे संकट येण्यापूर्वी व्यक्तीला काही छोटे-छोटे संकेत मिळत असतात, ते संकेत ओळखता आले पाहिजेत.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात हे संकेत मिळत असतील तर समजून जा, तुम्ही मोठ्या संकटात सापडणार आहात
चाणक्य नीती Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 28, 2025 | 8:16 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते विचार आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? येणाऱ्या संकटांचा सामना कसा करावा? तसेच आपल्यावर जर एखादं संकट येणार असेल तर त्याची चाहुल कशी ओळखावी? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात कोणतंही संकट असं अचानक येत नसतं, तर ते संकट येण्यापूर्वी काही संकेत देत असतं, हे संकेत जर आपल्याला ओळखता आले तर माणूस या संकटातून बाहेर पडू शकतो, किंवा संकट येण्यापूर्वीच काही उपाय करता येतात. चला तर मग जाणून घेऊयात हे संकेत नेमके कोणते आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

चाणक्य म्हणतात कधी-कधी तुमच्या आयुष्यात अशी वेळ येते की तुम्ही खूप कष्ट करता, पण तुम्हाला अपेक्षित फळ मिळत नाही. हा देखील एक मोठा संकेत असतो. जेव्हा तुम्हाला खूप कष्ट करून देखील फळ मिळत नाही, तेव्हा तुम्ही अचानक तुमचा संयम गमावून बसता, त्यामुळे मोठ्या संकटाला आमंत्रण मिळतं. मात्र अशावेळी हे संकेत ओळखून माणसानं संयम ठेवावा. ही वेळ तुमची नाही, हे ओळखावं आणि योग्य वेळ येताच पुन्हा निर्णय घ्यावा, तर तुम्हाला नक्की यश मिळेलं.

स्वार्थी, फसवणूक करणारे लोक – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या आयुष्यात स्वार्थी आणि विश्वासघात करणाऱ्या लोकांची गर्दी होऊ लागते, तेव्हा हा संकेत तुम्ही वेळीच ओळखा, हे तुमच्यावर येणाऱ्या भविष्यातील संकटाचे संकेत असतात. अशा लोकांपासून नेहमी सावध रहा. या लोकांना जेवढं शक्य होईल तेवढं दूर ठेवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

गृह कलह- चाणक्य म्हणतात जेव्हा कोणतंही कारण नसताना तुमच्या घरात गृहकलह वाढतो, तेव्हा समजून जा की हे एका फार मोठ्या संकटाचे संकेत आहेत. तुम्ही जर वेळीच सावध झालात, आणि यातून बाहेर पडलात तर अशा संकटातून तुम्ही वाचू शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.