AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात ‘असे’ लोक कधीच धनवान बनत नाहीत, खिसा राहातो रिकामा

चाणक्य हे महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात 'असे' लोक कधीच धनवान बनत नाहीत, खिसा राहातो रिकामा
| Updated on: May 07, 2025 | 9:57 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ, राजनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये विविध विषयांवर चर्चा केली आहे. ज्यामध्ये व्यक्तीनं आयुष्य जगताना काय करावं? काय करू नये? कोणत्या चुका टाळाव्यात? आदर्श पती कोणाला म्हणावं? पतीची कर्तव्य काय आहेत? पत्नीची कर्तव्य काय आहेत? मुलगा आणि आई-वडिलांचं नातं कसं असावं? खरा मित्र कसा ओळखावा? शत्रू कोणाला म्हणावं? स्वार्थी लोक कसे ओळखावेत असे एकना अनेक विचार आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये माडले आहेत.

चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये असे काही गुण सांगितले आहेत, ते जर व्यक्तीत  असतील तर तो व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, असं चाणक्य म्हणतात. जर व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल, तो जर जुगार खेळत असेल, परस्त्रीचा नाद असेल तर असा व्यक्ती आयुष्यभर कंगाल राहातो, त्यामुळे या सवयी असता कामा नये असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आर्य चाणक्य म्हणतात जर एखाद्या व्यक्तीला कुठलंही व्यसन असेल समजा तो जर दारू पित असेल तर असा व्यक्ती आपल्या उत्पन्नातील मोठा वाटा हा त्या व्यसनावर खर्च करतो, त्यामुळे तो आपल्या आयुष्यात कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. त्यामुळे व्यक्तींनी व्यसन करता कामा नये,

पुढे चाणक्य सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला जुगार खेळण्याचा नाद असेल तर असा व्यक्ती बरबाद होतो. कारण आपन किती पैसा खर्च करतो याचं भाव जुगाराच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला नसतं, त्यामुळे असा व्यक्ती आयुष्यात कधीच श्रीमंत होऊ शकत नाही.

चाणक्य म्हणतात जो व्यक्ती आपली बायको सोडून दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो, किंवा तिला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो असा व्यक्ती देखील श्रीमंत होऊ शकत नाही, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर या गोष्टींचा त्याग करावा असा सल्ला चाणक्य देतात.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा