AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तुम्हाला श्रीमंत व्हायचंय? मग या तीन सवयी आजच सोडा

आर्य चाणक्य हे महान विचारवंत, अर्थशास्त्राज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला.

Chanakya Niti : तुम्हाला श्रीमंत व्हायचंय? मग या तीन सवयी आजच सोडा
| Updated on: Jun 14, 2025 | 6:27 PM
Share

आर्य चाणक्य हे महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये आयुष्य जगताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत? याचं सार थोडक्यात मांडलं आहे. आदर्श पत्नी कशी असावी? आदर्श पतीचे लक्षणं काय असतात. आपला खरा मित्र कोणाला म्हणावं? शत्रू कसा ओळखावा? राजा कसा असावा? अशा अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मांडल्या आहेत.

चाणक्य म्हणतात अशा काही सवयी असतात, ज्या सवयी तुमच्या श्रीमंतीच्या मार्गात कायम अडथळा ठरतात. या सवयीमुळे तुमच्यावर मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. त्यामुळे अशा सवयींचा त्याग करण्यातच तुमचं भलं आहे. कोणत्या आहेत त्या सवयी? चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात.

आळस – आर्य चाणक्य म्हणतात आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जर तुम्ही आळशी असाल, कामामध्ये टाळाटाळ करत असाल तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. या जगात कष्टाला पर्याय नाही. तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केले तर तुम्हाला त्यातून अर्थप्राप्ती होईल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल.

राग – आर्य चाणक्य म्हणतात रागीट स्वभवाचा माणूस कोणालाही आपला शत्रूच वाटतो. त्यामुळे कोणतंही काम करत असताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करा. त्या कामात तुम्हाला यश नक्की मिळेल.

पैशांची बचत – आर्य चाणक्य म्हणतात जे लोक पैशांची उधळपट्टी करतात ते नंतर मोठ्या संकटात सापडतात. त्यामुळे आयुष्यात बचत महत्त्वाची आहे. तुम्ही जर आता बचत केली तर संकट काळामध्ये हाच पैसा तुमच्या उपयोगाला येणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.