AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या दोन गोष्टींना घाबरलात तर संपलात म्हणून समजा, चाणक्य यांनी सांगितलं आयुष्यातील कटू सत्य

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही लागू होतात. चाणक्य यांचे विचार हे माणसाला विचार करण्यास भाग पाडतात. आज आपण चाणक्य यांच्या अशाच काही विचारांबद्दल जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : या दोन गोष्टींना घाबरलात तर संपलात म्हणून समजा, चाणक्य यांनी सांगितलं आयुष्यातील कटू सत्य
चाणक्य नीती Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 05, 2026 | 9:33 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही कालबाह्य वाटत नाहीत, उलट चाणक्य यांनी जे विचार आपल्या या ग्रंथामध्ये मांडले आहेत, ते माणसाला विचार करण्यास प्रवृत्त करतात. चाणक्य म्हणतात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात, काही संकटं तर अशी असतात की ज्यामुळे माणूस पूर्णपणे कोलमडून जातो, खचतो. पण लक्षात ठेवा संकट कितीही मोठं असू द्या, तुम्ही त्यावर संयमानं मात करू शकता. कोणतीही वेळ ही बसून राहत नाही, त्यामुळे जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ असते, तेव्हा अशा स्थितीमध्ये घाबरून जाऊ नका, तर शांत मनाने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. मात्र संकटाच्या काळात जर तुम्ही खचलात, तर तुमची कोणीही मदत करू शकणार नाही. जगात अशा दोन गोष्टी आहेत, ज्या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, त्यांना कधीही घाबरू नका, जर तुम्ही या दोन गोष्टींना घाबरलात तर तुम्ही संपलात असं समजा, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आयुष्यातील बदल – आर्य चाणक्य म्हणतात बदल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे, तुम्ही जन्माला आला तेव्हा अगदी लहान बाळ असतात, तेव्हा तुमच्या गरजा या वेगळ्या असतात, त्यानंतर तुमचं शिक्षण सुरू होतं, त्यानंतर तुम्ही तरुण होता, रोजगाराचा शोध घेतात. आधी तुमची जबाबदारी ही तुमच्या आई-वडिलांवर असते, मात्र कालांतराने तुमच्या आई -वडिलांची जबाबदारी ही तुमच्यावर येते. तुमच्या बायको आणि मुलांची जबाबदारी देखील तुमच्यावर असते, असे बदल आयुष्यात मरेपर्यंत सुरू असतात. या बदलांना सहज स्विकारता आलं पाहिजे, जर तुम्ही या बदलांमुळे गोंधळून गेलात तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकणार नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संघर्ष – चाणक्य म्हणतात जो जन्माला आला त्याला संघर्ष हा करावाच लागणार आहे, प्रत्येकासाठी संघर्षाची व्याख्या भलेही वेगवेगळी असेल मात्र संघर्ष हा करावाच लागतो. या जगात कोणतीही गोष्ट ही फुकट मिळत नाही, त्यासाठी तिची किंमत मोजावी लागते, त्यामुळे आयुष्यात कधीही संघर्षाला घाबरू नका, संघर्ष अटळ आहे, त्यामुळे त्याच्याशी दोन हात करा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच...
येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; नेत्याच्या मुलाची पोस्ट व्हायरल
उमरग्यात येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
Eknath Shinde | षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...