AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तुमच्याकडेही असतील हे 2 गुण तर लोक तुमचा गैरफायदा घेणारच, चाणक्य यांनी काय सांगितलंय?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. माणसाचा स्वभाव कसा असावा? जगात वावरताना माणसानं कसा व्यवहार करावा? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : तुमच्याकडेही असतील हे 2 गुण तर लोक तुमचा गैरफायदा घेणारच, चाणक्य यांनी काय सांगितलंय?
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 9:29 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील उपयोगाच्या आहेत. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाचा स्वभाव कसा असावा आणि समाजामध्ये वावरताना इतरांसोबत व्यवहार कसा करावा? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या समाजात दोन प्रकारचे लोक असतात, एक जे अत्यंत स्वार्थी असतात. दुसरे जे अत्यंत प्रेमळ आणि निस्वार्थ भावनेनं काम करणारे असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा या जगात जे लोक स्वार्थी आहेत, ते लोक सर्वसामान्य लोकांना लुटण्याचं काम करतात. ते आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जावू शकतात, त्यामुळे अशा लोकांपासून मानसाने नेहमी सावध राहिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

चाणक्य पुढे म्हणतात मानसाने नेहमी निस्वार्थ असावं, इतरांच्या मदतीला धावून जावं. मात्र जे लोक आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतात अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं. माणूस हा कधीच सरळ मार्गी असू नये. जर तुमचा स्वभाव हा सरळमार्गी असेल, कोणताही विचार न करता समोरच्या व्यक्तीची मदत करण्याचा स्वभाव तुमचा असेल तर लोक तुमचा गैर फायदा घेतील. ज्यामुळे भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

हे पटून देण्यासाठी चाणक्य यांनी एक उदाहरण देखील दिलं आहे. चाणक्य म्हणतात की जी सरळ झाडं असतात त्याचे फायदे अनेक असतात. त्यामुळे जंगलातील अशीच झाडं सर्वात आधी कापली जातात. मात्र जी झाडं वाकडी असतात ती झाडं वर्षानुवर्ष टिकून असतात. कारण त्यांना कोणी कापत नाही. त्यामुळे माणसानं कधीही सरळ मार्गी असू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच माणसानं जशासतसं वागावं,जर एखादा व्यक्ती तुमच्यासोबत चांगला वागला तर तुम्ही देखील त्याच्याशी चांगलं वागा, आणि जर एखादा तुमची फसवणूक करत असेल तर त्याला धडा शिकवा, असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर....