AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, तसेच ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी माणसाच्या अशा काही सवीय सांगितल्या आहेत, त्या जर तुम्हाला असतील तर कधीही आयुष्यात आर्थिक समस्या येत नाही.

Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
cahankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 8:39 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे अर्थतज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात असे काही लोक असतात की ज्यांच्याजवळ एकही रुपया नसते, मात्र त्यांच्या वृद्धापकाळात असे लोक प्रचंड श्रीमंत होतात, तर दुसरीकडे असे देखील काही लोक असतात, ज्यांच्याकडे त्यांच्या तरुणपणात अफाट संपत्ती असते, मात्र वृद्धापकाळात त्यांच्याकडे एकही रुपया राहत नाही, तर हे असं का होतं तर पैशांचं योग्य प्रकारे नियोजन न केल्यामुळे माणसावर हे संकट ओढावतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. पुढे चाणक्य यांनी असंही म्हटलं आहे की, काही अशा सवयी असतात ज्या जर माणसाने आत्मसात केल्या तर त्याला आयुष्यात कधीही पैशांची कमी पडणार नाही.

पैशांची बचत – चाणक्य म्हणतात माणसानं आपल्या आयुष्यात पैशांची बतत ही केलीच पाहिजे. कारण जर तुमच्याकडे पैसे असतील तर आणि तरच समाजात तुम्हाला किंमत मिळते, अन्यथा तुमच्या घरचे देखील तुम्हाला विचारत नाहीत, त्यामुळे तुम्ही जर 100 रुपये कमावत असाल तर त्यातील 25 रुपये तुम्ही बचत केली पाहिजे.

आर्थिक शिस्त- चाणक्य म्हणतात माणसासाठी आर्थिक शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. जर माणसाला आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही पैशांची बचत करू शकत नाहीत. कुठे पैसा खर्च करायचा आणि कुठे करायचा नाही, याचं ज्ञान माणसाला हवं, तसेच निरर्थक ठिकाणी पैसे खर्च करण्याची सवय माणसाला असू नये.

पैशांचं गणित – चाणक्य म्हणतात माणसाने पैशांचा हिशोब चोख ठेवला पाहिजे, आपल्याकडे सध्या किती पैसे आहेत? किती खर्च होणार आहेत? आपल्याकडे किती शिल्लक आहेत, याचं गणित माणसाला जमलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.