AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, तसेच ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी माणसाच्या अशा काही सवीय सांगितल्या आहेत, त्या जर तुम्हाला असतील तर कधीही आयुष्यात आर्थिक समस्या येत नाही.

Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
cahankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 8:39 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे अर्थतज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात असे काही लोक असतात की ज्यांच्याजवळ एकही रुपया नसते, मात्र त्यांच्या वृद्धापकाळात असे लोक प्रचंड श्रीमंत होतात, तर दुसरीकडे असे देखील काही लोक असतात, ज्यांच्याकडे त्यांच्या तरुणपणात अफाट संपत्ती असते, मात्र वृद्धापकाळात त्यांच्याकडे एकही रुपया राहत नाही, तर हे असं का होतं तर पैशांचं योग्य प्रकारे नियोजन न केल्यामुळे माणसावर हे संकट ओढावतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. पुढे चाणक्य यांनी असंही म्हटलं आहे की, काही अशा सवयी असतात ज्या जर माणसाने आत्मसात केल्या तर त्याला आयुष्यात कधीही पैशांची कमी पडणार नाही.

पैशांची बचत – चाणक्य म्हणतात माणसानं आपल्या आयुष्यात पैशांची बतत ही केलीच पाहिजे. कारण जर तुमच्याकडे पैसे असतील तर आणि तरच समाजात तुम्हाला किंमत मिळते, अन्यथा तुमच्या घरचे देखील तुम्हाला विचारत नाहीत, त्यामुळे तुम्ही जर 100 रुपये कमावत असाल तर त्यातील 25 रुपये तुम्ही बचत केली पाहिजे.

आर्थिक शिस्त- चाणक्य म्हणतात माणसासाठी आर्थिक शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. जर माणसाला आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही पैशांची बचत करू शकत नाहीत. कुठे पैसा खर्च करायचा आणि कुठे करायचा नाही, याचं ज्ञान माणसाला हवं, तसेच निरर्थक ठिकाणी पैसे खर्च करण्याची सवय माणसाला असू नये.

पैशांचं गणित – चाणक्य म्हणतात माणसाने पैशांचा हिशोब चोख ठेवला पाहिजे, आपल्याकडे सध्या किती पैसे आहेत? किती खर्च होणार आहेत? आपल्याकडे किती शिल्लक आहेत, याचं गणित माणसाला जमलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...