AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जर तुम्हालाही वारंवार अपयश येत असेल तर चाणक्य म्हणतात या तीन गोष्टी लक्षात ठेवा

आर्य चाणक्य म्हणतात जर तुम्हालाही वारंवार अपयश येत असेल तर खचून जावू नका, अपयशाची कारणं शोधा एक दिवस तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल.

Chanakya Niti : जर तुम्हालाही वारंवार अपयश येत असेल तर चाणक्य म्हणतात या तीन गोष्टी लक्षात ठेवा
| Updated on: May 22, 2025 | 11:05 AM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, राजनितीतज्ज्ञ आणि कुटनितीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा संबंध जीवन जगत असताना प्रत्यक्षपणे तुमच्याशी येतो. आयुष्यात काय करावं? काय करू नये याबाबत अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. राजा पासून ते प्रजेपर्यंत आणि मित्रांपासून ते शत्रूपर्यंत अशा एकना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.

चाणक्य म्हणतात तुम्हाला जर वारंवार आपयश येत असेल तर खचून जाऊ नका, अशा परिस्थितीमध्ये शांत राहा, तुम्हाला अपयश का येतं? त्याच्या कारणांचा शोध घ्या, त्या चुका पुन्हा करू नका. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आर्य चाणक्य म्हणतात की अपयशामधून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्यामुळे जर एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आले तर प्रयत्न करणं सोडू नका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य यांनी यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

खचून जाऊ नका – आर्य चाणक्य म्हणतात तुम्हाला जर वारंवार अपयश येत असेल तर येऊ द्या, मात्र तुम्ही खचून जाऊ नका, पराभवाच्या भीतीनं प्रयत्न करणं सोडू नका. कारण प्रयत्न सोडले तर ती तुमीच सर्वात मोठी हार असेल, पण तुम्ही जर सतत प्रयत्न करत राहिले तर एक दिवस यश निश्चितच तुमचं असणार आहे.

पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करा – आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करा, आपल्याला ही गोष्टी मिळवायचीच आहे, असं ठरवा आणि कामाला लागा.

संयम ठेवा –   आर्य चाणक्य म्हणतात कोणत्याही गोष्टीमध्ये संयम महत्त्वाचा असतो. जर तुम्ही संयम ठेवला तर एक दिवस यश नक्कीच तुमचं असणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.