AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | काहीही झालं तरी 3 गोष्टी करायला कधीही संकोच करू नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

चाणक्य नीतीमध्ये लिहिलेल्या गोष्टींमधून आजच्या काळातही खूप काही शिकता येते. आचार्यांनी चाणक्य नीतीमध्ये तीन गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या व्यक्तीला या कामांमध्ये लाज वाटली त्याला आयुष्यात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

Chanakya Niti | काहीही झालं तरी 3 गोष्टी करायला कधीही संकोच करू नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा
chanakya-niti
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 8:45 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्यांच्या स्वभावाने आणि कुशाग्र बुद्धीने त्यांना उत्तम मुत्सद्दी, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ बनवले. तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर आचार्यांनी तेथे दीर्घकाळ अध्यापन केले आणि सर्व शिष्यांचे भविष्य घडवले. त्या काळात त्यांनी अनेक रचनाही केल्या. त्या रचनांपैकी चाणक्य नीती आजही खूप लोकप्रिय आहे. चाणक्य नीतीमध्ये लिहिलेल्या गोष्टींमधून आजच्या काळातही खूप काही शिकता येते. आचार्यांनी चाणक्य नीतीमध्ये तीन गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या व्यक्तीला या कामांमध्ये लाज वाटली त्याला आयुष्यात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

उधार दिलेले पैसे मागायला लाजू नका

आचार्य चाणक्यांच्या मते जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते मागायला लाज वाटू नका. तसेच हे करताना कोणतेही नाते मधे येऊ देऊ नका कारण जर तुम्हाला पैशाच्या बाबतीत लाज वाटली तर त्याचे नुकसान तुम्हालाच भोगावे लागेल. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त तुम्ही दिलेले पैसे मागत आहात, दुसऱ्याचे नाही.

पोटभर जेवायला लाजू नका

अन्न नेहमी पोटभर खावे असे म्हणतात. पण काही लोक नातेवाईक किंवा मित्राच्या घरी जातात तेव्हा त्यांना नीट जेवता येत नाही आणि अर्धे पोटच उठते. हे करू नये. जर तुम्ही जेवायला बसला असाल तर पोट भरून खा, त्यात कधीही लाज वाटू नये.

गुरूकडून ज्ञान घेण्यास संकोच करू नका

जर तुम्ही गुरूंकडून ज्ञान घेत असाल तर कधीही लाज वाटू नका, नेहमी जिज्ञासू राहा कारण जेवढे ज्ञान घेता येईल तेवढे घ्या. काही लोकांना गुरूंकडे कुतूहल व्यक्त करताना लाज वाटते, परंतु असे करून तुम्ही स्वतःचे नुकसान करता आणि भविष्यात तुम्हाला त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शक्य तितके प्रश्न विचारून, उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

संबंधित बातम्या :

Shagun-Apshagun | उंदीर-चिचुंद्री घरात असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या…

PHOTO | Vastu Tips : अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी स्टडी रुममध्ये लावा ‘ही’ 4 झाडे

Kaal Sarp Dosh : कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी हे महाउपाय करा…

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी! 2 तासांत 2 किलोमीटर अंतर पार
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी! 2 तासांत 2 किलोमीटर अंतर पार.
थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान
थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान.
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात...; संजय राऊतांचं विधान.
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल
मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका.
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला.
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;.
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?.
महाजनांच्या कारभारावरुन नाशिक भाजपात कलह?
महाजनांच्या कारभारावरुन नाशिक भाजपात कलह?.
धक्कादायक! गटारीच्या पाण्याने धुतली फळं; वसई-विरारमधला व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! गटारीच्या पाण्याने धुतली फळं; वसई-विरारमधला व्हिडीओ व्हायरल.