AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन ठिकाणांहून निघताना कधीच मागे वळून बघू नका, त्यातच तुमचं हीत

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंंथ लिहिला या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी म्हटलं आहे की, या जगात असे तीन ठिकाणं आहेत, ते सोडल्यानंतर कधीही मागे वळून पाहू नका.

Chanakya Niti : या तीन ठिकाणांहून निघताना कधीच मागे वळून बघू नका, त्यातच तुमचं हीत
CHANAKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 12, 2026 | 9:46 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाने आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात समाजात असे तीन ठिकाणं आहे, या ठिकाणांहून तुम्ही जेव्हा परतीच्या प्रवासाला लागतात, तेव्हा कधीही मागे वळून पाहू नये, त्यातच तुमचं हीत आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

एखाद्या व्यक्तीला पैसे उधार दिल्यानंतर किंवा त्याची मदत केल्यानंतर – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला मदत करतात किंवा त्याला पैसे उधार देतात, अशा वेळी जेव्हा तुम्ही त्याचं घर सोडता, तेव्हा कधीही मागे वळून पाहू नका, कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीला निस्वार्थ भावनेतून मदत केलेली असते. परंतु तुम्ही जेव्हा मागे वळून पहाता, तेव्हा अशावेळी त्या व्यक्तीच्या मनात देखील तुमच्या मदतीबद्दल संकोच निर्माण होतो आणि तुमच्या मनात देखील अभिमान निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशावेळी कधीही मागे वळून पाहून नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कोर्ट कचेरी किंवा एखाद्या वादग्रस्त जागेतून बाहेर पडल्यानंतर – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या कोर्ट कचेरीच्या ठिकाणावरून बाहेर पडतात तेव्हा कधीही मागे वळून पाहू नका, जेव्हा तुम्ही अशा ठिकाणाकडे पुन्हा वळून पहाता याचा अर्थ तुम्ही अजूनही मानसिकरित्या तिथेच अडकलेले आहात असा त्याचा अर्थ होतो.

कपटी व्यक्तीच्या घरातून बाहेर पडताना – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा एखाद्या कपटी व्यक्तीच्या घरातून बाहेर पडता, तेव्हा कधीही मागे वळून पाहू नका, तसेच त्याच्या घरी देखील पुन्हा कधी जाऊ नका, त्यातच तुमचं हीत आहे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ