AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : असे लोक मृत्यूनंतरही जिवंत राहतात, चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलंय?

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत होते, चाणक्य यांच्या मते असे काही लोक असतात जे मृत्यूनंतरही लोकांच्या मनात कायम जिवंत असतात. त्या लोकांना समाज कधीही विसरत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : असे लोक मृत्यूनंतरही जिवंत राहतात, चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलंय?
chanakya niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 7:29 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समाजामध्ये तुम्हाला विविध स्वभावाचे लोक भेटतात. काही लोक हे स्वार्थी असतात, तर काही लोक हे धूर्त मनाने कपटी असतात. तर काही लोक हे मनाने खूप चांगले असतात. गरज असेल तर असे लोक नेहमी इतरांच्या मदतीला धावून जातात. ज्या लोकांचा स्वभाव हा धूर्त असतो, कपटी असतो, जे लोक छोट्या-छोट्या फायद्यांसाठी देखील इतरांची फसवणूक करण्यास मागे -पुढे पहात नाहीत. असे लोक समाजात बदनाम होतात. एक वेळ तर अशी येते की अशा लोकांवर कोणीही विश्वास ठेवत नाही, असे लोक जिवंतपणीच समाजासाठी मेलेले असतात. तर या समाजात असे देखील काही लोक असतात जे आपल्या स्वभावामुळे सर्वांची मने जिंकून घेतात, कधीही कोणाचं नुकसान करत नाहीत, असे लोक जिवंतपणी सर्वांना हवेच असतात, मात्र जेव्हा अशा लोकांचा मृत्यू होतो, तेव्हा देखील समजा या लोकांना कायम लक्षात ठेवतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कर्म – चाणक्य म्हणतात समाजात कर्माला खूप महत्त्व आहे. या ठिकाणी एक लक्षात ठेवा की जेव्हा तुमचा मृत्यू होतो, तेव्हा तुम्ही सर्व गोष्टी पाठिमागे ठेवता. मात्र कर्म ही एक अशी गोष्ट आहे, जी मृत्यूनंतरही तुमच्यासोबतच असते. कर्मामधून कधीही व्यक्तीची सुटका होत नाही. त्यामुळे माणसाने आपले कर्म नेहमी चांगले ठेवावेत. जो माणूस आपल्या आयुष्यात वाईट कर्म करतो, लोकांची फसवणूक करतो. चुकीच्या पद्धतीने धन कमावतो, अशा लोकांना समाजात कधीही आदराचं स्थान नसतं. तसेच त्याचा मृत्यू झाल्यानंतर देखील समाज त्याला लक्षात ठेवत नाही, अशा लोकांकडे नेहमी दुर्लक्ष होतं. मात्र ज्याचे कर्म चांगले असतात, जो लोकांची कधीही फसवणूक करत नाही, चांगल्या मार्गाने धन कमावतो, गरजू लोकांना दान करतो, अशा लोकांना समाज कायम लक्षात ठेवतो.

अशा लोकांचा जेव्हा मृत्यू होतो, मृत्यूनंतर देखील शेकडो वर्ष अशी लोक कायम समाजाच्या मनात, त्यांच्या विचारने जिवंत असतात. अशा लोकांचे विचार हे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम करतात. तुम्ही कर्म काय केलं त्यावर तुमची किर्ती अवलंबून असते. त्यामुळे आयुष्यात नेहमी आपले कर्म चांगले ठेवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. ज्या माणसाचे कर्म चांगले असतात तो मृत्यूनंतरही कायम लोकांच्या मनात राहतो, असं चाणक्य यानी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.