AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : असे लोक मृत्यूनंतरही जिवंत राहतात, चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलंय?

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत होते, चाणक्य यांच्या मते असे काही लोक असतात जे मृत्यूनंतरही लोकांच्या मनात कायम जिवंत असतात. त्या लोकांना समाज कधीही विसरत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : असे लोक मृत्यूनंतरही जिवंत राहतात, चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलंय?
chanakya niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 7:29 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समाजामध्ये तुम्हाला विविध स्वभावाचे लोक भेटतात. काही लोक हे स्वार्थी असतात, तर काही लोक हे धूर्त मनाने कपटी असतात. तर काही लोक हे मनाने खूप चांगले असतात. गरज असेल तर असे लोक नेहमी इतरांच्या मदतीला धावून जातात. ज्या लोकांचा स्वभाव हा धूर्त असतो, कपटी असतो, जे लोक छोट्या-छोट्या फायद्यांसाठी देखील इतरांची फसवणूक करण्यास मागे -पुढे पहात नाहीत. असे लोक समाजात बदनाम होतात. एक वेळ तर अशी येते की अशा लोकांवर कोणीही विश्वास ठेवत नाही, असे लोक जिवंतपणीच समाजासाठी मेलेले असतात. तर या समाजात असे देखील काही लोक असतात जे आपल्या स्वभावामुळे सर्वांची मने जिंकून घेतात, कधीही कोणाचं नुकसान करत नाहीत, असे लोक जिवंतपणी सर्वांना हवेच असतात, मात्र जेव्हा अशा लोकांचा मृत्यू होतो, तेव्हा देखील समजा या लोकांना कायम लक्षात ठेवतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कर्म – चाणक्य म्हणतात समाजात कर्माला खूप महत्त्व आहे. या ठिकाणी एक लक्षात ठेवा की जेव्हा तुमचा मृत्यू होतो, तेव्हा तुम्ही सर्व गोष्टी पाठिमागे ठेवता. मात्र कर्म ही एक अशी गोष्ट आहे, जी मृत्यूनंतरही तुमच्यासोबतच असते. कर्मामधून कधीही व्यक्तीची सुटका होत नाही. त्यामुळे माणसाने आपले कर्म नेहमी चांगले ठेवावेत. जो माणूस आपल्या आयुष्यात वाईट कर्म करतो, लोकांची फसवणूक करतो. चुकीच्या पद्धतीने धन कमावतो, अशा लोकांना समाजात कधीही आदराचं स्थान नसतं. तसेच त्याचा मृत्यू झाल्यानंतर देखील समाज त्याला लक्षात ठेवत नाही, अशा लोकांकडे नेहमी दुर्लक्ष होतं. मात्र ज्याचे कर्म चांगले असतात, जो लोकांची कधीही फसवणूक करत नाही, चांगल्या मार्गाने धन कमावतो, गरजू लोकांना दान करतो, अशा लोकांना समाज कायम लक्षात ठेवतो.

अशा लोकांचा जेव्हा मृत्यू होतो, मृत्यूनंतर देखील शेकडो वर्ष अशी लोक कायम समाजाच्या मनात, त्यांच्या विचारने जिवंत असतात. अशा लोकांचे विचार हे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम करतात. तुम्ही कर्म काय केलं त्यावर तुमची किर्ती अवलंबून असते. त्यामुळे आयुष्यात नेहमी आपले कर्म चांगले ठेवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. ज्या माणसाचे कर्म चांगले असतात तो मृत्यूनंतरही कायम लोकांच्या मनात राहतो, असं चाणक्य यानी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप