
आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये जीवन साधे आणि यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस यश मिळवू शकतो. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात घराच्या प्रमुखामध्ये कोणते गुण असावेत हे स्पष्ट सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते, कुटुंबाचा प्रमुख असा असावा की तो वैध पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची खात्री पुर्णपणे झाल्याशिवाय निर्णय घेत नाही. इतेकच नाही तर एखाद्या महत्वाच्या निर्णयामध्ये कुटुंबाला देखीलसोबत घेतो.

कुटुंब प्रमुखाने घरखर्चाची काळजी घ्यावी. कोणताही खर्च काळजीपूर्वक करावा. अनावश्यक पैसे खर्च केल्याने आर्थिक समस्या तर निर्माण होतातच पण त्यामुळे कुटुंबात चुकीचा संदेशही जातो.

कोणताही निर्णय घेताना घरच्या प्रमुखाने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार केला पाहिजे. कारण कुटुंब प्रमुखाचा एखादा चुकीचा निर्णय देखील सर्वांसाठी घातक ठरतो.

कुटुंबप्रमुखाने आपल्या निर्णयांवर ठाम राहावे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये शिस्तीत राहण्याची सवय लागते. कुटुंबप्रमुखाने आपल्या निर्णयांवर ठाम असले पाहिजे.