AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti – या पाच खास नीती बनवतील तुम्हाला श्रीमंत, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवानं आपल्या जीवनाचं व्यवस्थापन कसं करावं? हे खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे. आज आपण अशाच काही नीतींबद्दल जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti - या पाच खास नीती बनवतील तुम्हाला श्रीमंत, चाणक्य काय सांगतात?
चाणक्य Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 03, 2025 | 7:54 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवानं आपल्या जीवनाचं व्यवस्थापन कसं करावं? याबद्दल खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे. मानसाने कुठे बोलावं? कुठे गप्प राहावं? पैसे कुठे खर्च करावेत? पैसे कुठे बचत करावेत? मुलांवर संस्कार कसे करावेत? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात असे काही गुण असतात जे कोणत्याही व्यक्तीमध्ये असतील तर असा व्यक्ती कितीही गरीब असला तर तो शुन्यातून जग उभारू शकतो. असा व्यक्ती श्रीमंत बनू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.

वेळेची किंमत – चाणक्य म्हणतात जे लोक वळेची किंमत करतात, ते आयुष्यात नक्कीच यशस्वी होतात. लक्षात ठेवा गेलेली वेळ कधीच येत नाही. त्यामुळे प्रत्येक काम हे वेळेतच केलं पाहिजे. कोणतंही काम उद्यावर ढकलू नका, परिस्थिती कशी असो, तुम्ही एकदा एखाद्या कामाचा निश्चिय केला की लगेच त्या कामाला सुरुवात करा, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

रणनीती – चाणक्य म्हणतात तुम्हाला जे काम करायचं आहे, त्याची सर्वात आधी रणनीती ठरवा, कुठल्याही कामाची रणनीती ठरवताना आपलं हे काम कशासाठी करत आहोत, या कामातून आपला किती फायदा होणार आहे? फायदा वाढवण्यासाठी काय करता येईल? हे काम आपल्याला किती दिवसांमध्ये पूर्ण करायचं आहे? या गोष्टी लक्षात घ्या, असं चाणक्य म्हणतात.

योजना गुपीत ठेवा – चाणक्य म्हणतात तुम्ही जी योजना बनवली आहे, ती योजना तोपर्यंत कोणालाच सांगू नका, जोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही.

नियोजन – चाणक्य म्हणतात कुठल्याही कामात नियोजना खूप महत्त्व असतं, योग्य नियोजनाशिवाय कोणतंही काम पूर्ण होऊ शकत नाही.

संयम – चाणक्य म्हणतात आयुष्यात संयम या शब्दाला खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला अपयश आलं असेल तर संयम ठेवा आणि पुन्हा कामाला लागा, एक दिवस तुम्हाला यश मिळणारच आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...