AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे लोक असतात खूपच घातक, त्यांच्याशी कधीच मैत्री करू नका

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात मैत्री इतकी दुसरी सुंदर गोष्ट कोणतीच नाही, मात्र जेव्हा आपण चुकीच्या व्यक्तीसोबत मैत्री करतो, तेव्हा नक्कीच आपल्यावर पश्चातापाची वेळ येते.

Chanakya Niti : हे लोक असतात खूपच घातक, त्यांच्याशी कधीच मैत्री करू नका
चाणक्य नीतीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 04, 2025 | 8:07 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी जीवनाशी संबंधित जवळपास सर्व गोष्टींवर लिखाण केलं आहे. मैत्री हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. आपण आपल्या आयुष्यात अनेकांसोबत मैत्री करतो, काही लोकांसोबत केलेली मैत्री आयुष्याच्या शेवटपर्यंत टीकते, चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मैत्रीसंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ते म्हणतात मैत्री ही या जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. मात्र जेव्हा आपण चुकीच्या माणसांसोबत मैत्री करतो, तेव्हा आपल्यावर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे मैत्री ही नेहमी जपून करावी, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. मैत्री कोणासोबत करू नये, याबाबत चाणक्य काय म्हणतात जाणून घेऊयात.

सतत खोटं बोलणारी माणसं – चाणक्य म्हणतात जी लोक सतत खोटं बोलतात ते लोक मैत्रीच्या योग्यतेचे नसतात. ते त्यांच्या सवयीप्रमाणे तुमच्यासोबत देखील खोटंच बोलतात त्यामुळे तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता असते, त्यांच्या खोटेपणामुळे तुम्ही देखील संकटात सापडू शकतात. त्यामुळे अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नका.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, त्यांच्यासोबत चुकूनही मैत्री करू नये, कारण असे लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुमचाही बळी द्यायला मागे -पुढे पहात नाही, अशा लोकांशी केलेली मैत्री ही नेहमी नुकसानच करते, त्यामुळे अशा लोकांना आपल्या जवळपास देखील फिरकू देऊ नये, अशा लोकांपासून कायम सावध राहावं.

प्रचंड रागीट लोक – चाणक्य म्हणतात अशा लोकांसोबत तर मैत्रीच करू नये, कारण या लोकांना कधी राग येईल, आणि कधी ते रागाच्या भरात तुमच्यावर हल्ला करतील हे सांगता येत नाही, यांच्यासोबत मैत्री केल्यामुळे तुमचा जीवही संकटात सापडू शकतो, त्यामुळे अशा लोकांशी मैत्री टाळावी, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. तसेच अंहकारी लोकांसोबत देखील मैत्री करू नये असं चाणक्य सांगतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार