AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे लोक असतात खूपच घातक, त्यांच्याशी कधीच मैत्री करू नका

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात मैत्री इतकी दुसरी सुंदर गोष्ट कोणतीच नाही, मात्र जेव्हा आपण चुकीच्या व्यक्तीसोबत मैत्री करतो, तेव्हा नक्कीच आपल्यावर पश्चातापाची वेळ येते.

Chanakya Niti : हे लोक असतात खूपच घातक, त्यांच्याशी कधीच मैत्री करू नका
चाणक्य नीतीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 04, 2025 | 8:07 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी जीवनाशी संबंधित जवळपास सर्व गोष्टींवर लिखाण केलं आहे. मैत्री हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. आपण आपल्या आयुष्यात अनेकांसोबत मैत्री करतो, काही लोकांसोबत केलेली मैत्री आयुष्याच्या शेवटपर्यंत टीकते, चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मैत्रीसंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ते म्हणतात मैत्री ही या जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. मात्र जेव्हा आपण चुकीच्या माणसांसोबत मैत्री करतो, तेव्हा आपल्यावर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे मैत्री ही नेहमी जपून करावी, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. मैत्री कोणासोबत करू नये, याबाबत चाणक्य काय म्हणतात जाणून घेऊयात.

सतत खोटं बोलणारी माणसं – चाणक्य म्हणतात जी लोक सतत खोटं बोलतात ते लोक मैत्रीच्या योग्यतेचे नसतात. ते त्यांच्या सवयीप्रमाणे तुमच्यासोबत देखील खोटंच बोलतात त्यामुळे तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता असते, त्यांच्या खोटेपणामुळे तुम्ही देखील संकटात सापडू शकतात. त्यामुळे अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नका.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, त्यांच्यासोबत चुकूनही मैत्री करू नये, कारण असे लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुमचाही बळी द्यायला मागे -पुढे पहात नाही, अशा लोकांशी केलेली मैत्री ही नेहमी नुकसानच करते, त्यामुळे अशा लोकांना आपल्या जवळपास देखील फिरकू देऊ नये, अशा लोकांपासून कायम सावध राहावं.

प्रचंड रागीट लोक – चाणक्य म्हणतात अशा लोकांसोबत तर मैत्रीच करू नये, कारण या लोकांना कधी राग येईल, आणि कधी ते रागाच्या भरात तुमच्यावर हल्ला करतील हे सांगता येत नाही, यांच्यासोबत मैत्री केल्यामुळे तुमचा जीवही संकटात सापडू शकतो, त्यामुळे अशा लोकांशी मैत्री टाळावी, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. तसेच अंहकारी लोकांसोबत देखील मैत्री करू नये असं चाणक्य सांगतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?