AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन सवयी माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये सांगितलं आहे.

Chanakya Niti : या तीन सवयी माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, चाणक्य काय म्हणतात?
CHANKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 8:40 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य निती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य हे एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. माणसाने पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे खर्च करावा? पैसा कुठे खर्च करू नये? पैशांची बचत कशी करावी? याबद्दल देखील चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. राजा धनानंदच्या राज्यात चाणक्य यांचा अपमान झाला होता. त्यानंतर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्या मदतीने राजा धनानंदची राजवट उलथून लावून आपल्या अपमानाचा बदला घेतला. या काळात त्यांना जे अनुभव आले, तेच अनुभव चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मांडले आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अनेकदा कठीण काळ येतो, परंतु अशा परीक्षेच्या काळात माणसाने संयम ठेवणं गरजेचं असतं.

पुढे चाणक्य असंही म्हणतात की अशा काही सवयी असतात, ज्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. या गोष्टीपासून माणसाने दूर राहणंच त्याच्या हिताचं असतं. चला तर मग जाणून घेऊयात या सवयी नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात माणसाची संगत ही नेहमी चांगली असावी, जर माणसाची संगत ही चांगली असेल तर माणूस आयुष्यात यशस्वी होतो, परंतु जर माणसाची संगत ही वाईट असेल तर त्याचं आयुष्य उद्ध्वस होतं.

व्यसन – चाणक्य म्हणतात कोणत्याही गोष्टीचं व्यसन हे वाईटच असतं. यामुळे माणसाचा मोठा घात होऊ शकतो. व्यसनावर प्रचंड पैसा खर्च होतो. माणसाचं घराकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे माणसाने व्यसन टाळलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

थोरा-मोठ्यांचा अपमान – चाणक्य म्हणतात जे लोक आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात, अशा लोकांचा आपण कायम मान ठेवला पाहिजे, त्यांच्या अनुभवातून आपण शिकलं पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात