AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण? चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मानसाला आपलं आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांचे विचार अनेकांना प्रेरणा देतात.

Chanakya Niti : माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण? चाणक्य काय म्हणतात?
चाणक्य नीती Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 04, 2025 | 9:37 PM
Share

चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही लागू होतात. चाणक्य यांचे विचार कालबाह्य वाटत नाहीत. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानसानं आदर्श जीव कसं जगावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अशा काही चुका आहे, ज्या जर माणसाने आपल्या आयुष्यात केल्या तर त्याच्या वाट्याला आयुष्यभर कष्टच येतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून माणसानं वाचलं पाहिजे. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये माणसाचे काही शत्रू सांगितले आहेत, त्या गोष्टीपासून वाचण्यातच तुमचं हीत आहे, असं चाणक्य म्हणतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण? 

चाणक्य यांच्या मते आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. चाणक्य म्हणतात वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट हे केलेच पाहिजे. जर तुम्ही कष्ट टाळत गेलात तर एक दिवस तुम्ही फार मोठ्या संकटात सापडात, त्यावेळी परतीचे तुमचे सर्व मार्ग हे बंद झालेली असतील. त्यामुळे आयुष्यात कष्ट केलेच पाहिजे.

चाणक्य यांनी याासठी काही उदारहण देखील दिले आहेत, चाणक्य म्हणतात जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्या विद्यार्थी दशेत तुम्ही आभ्यास नाही केल तर एक वेळ अशी येते की, तुम्ही परीक्षेत पास होऊ शकत नाही. जर तुम्ही ज्ञानार्जनच केलं नाही तर तुम्ही जेव्हा मोठे होतात, तेव्हा तुम्हाला चांगला रोजगार मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता असते. तसेच पुढे चाणक्य  असं देखील म्हणतात हे नोकरदार वर्गाच्याबाबतीत देखील लागू होतं, नोकरदार वर्गानं आपल्या कामात कधीही आळस करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका.
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल.
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल...
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल....
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान.
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी...
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी....
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?.
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल.