AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaturmas 2023 : चातुर्मास यंदा चार ऐवजी पाच महिन्यांचा, कसं आणि काय दान केलं तर पदरी पडेल पुण्य जाणून घ्या

हिंदू धर्मात चातुर्मासाचं सर्वाधिक महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु निद्रावस्थेत जातात आणि चार महिन्यानंतर देवउठनी एकादशीला जागे होतात. पण यंदा चातुर्मास हा पाच महिन्यांचा असणार आहे.

Chaturmas 2023 : चातुर्मास यंदा चार ऐवजी पाच महिन्यांचा, कसं आणि काय दान केलं तर पदरी पडेल पुण्य जाणून घ्या
Chaturmas 2023 : चातुर्मासात यंदा एका महिन्याची भर! का आणि भगवान विष्णुंची कशी होईल कृपा, जाणून घ्या
| Updated on: Jun 24, 2023 | 6:31 PM
Share

मुंबई : प्रत्येक शुक्ल आणि कृष्ण पक्षातील पंधरवड्यात एकादशी असते. ही एकादशी भगवान विष्णुंना समर्पित असते. त्यात देवशयनी एकादशीचं महत्त्व अधिक आहे. या दिवशी भगवान विष्णुंची उपासना केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. या एकादशीपासून भगवान विष्णु चार महिन्यांसाठी निद्रावस्थेत जातात. या काळात सृष्टीचा भार भगवान शिवांच्या हाती असतो. 29 जून 2023 पासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. तर कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी असणार आहे. म्हणजेच 23 नोव्हेंबर 2023 रोजी ही तिथी असणार आहे. म्हणजेच पाच महिन्यांचा काळावधी असणार आहे.

चातुर्मास पाच महिन्यांचा असण्यामागचं कारण

यंदा अधिक श्रावस मास आहे. यामुळे श्रावण यंदा दोन महिन्यांचा असणार आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला संपतं. पण अधिक मासामुळे पाच महिन्यांचा चातुर्मास असणार आहे. या काळात भगवान विष्णुंसह देवी देवता योग निद्रेत जात असल्याने मंगलकार्य केली जात नाहीत.

देवशयनी एकादशीचं महत्त्व आणि मुहूर्त

आषाढी एकादशी 29 जून 2023 रोजी सकाळी 3 वाजून 18 मिनिटांनी सुरु होईल. तसेच ही तिथी 30 जून रोजी सकाळी 2 वाजून 42 मिनिटांनी संपेल. या दिवशी रवि योग असणार असून सकाळी 5:26 मिनिटे ते 4:30 मिनिटांपर्यंत असेल. शास्त्रानुसार, या दिवशी भगवान विष्णुंची उपासना केल्याने अक्षय पुण्य मिळतं. तसेच स्नान आणि दानाचं महत्त्व अधोरेखित होतं.

चातुर्मासात मंगलकार्य करत नाहीत

चातुर्मासात मुंडन, उपनयन संस्कार, विवाह, गृह प्रवेश, भूमि पूजन इत्यादी शुभ कार्य करत नाहीत. कारण या काळात भगवान विष्णु क्षीरसागरात निद्रा अवस्थेत असतात. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळत नाही. तसेच शुभ कार्यात विघ्न पडण्याची शक्यता असते. त्यामुळे शुभ कार्य करायचं असेल तर पाच महिने थांबाव लागणार आहे.

चातुर्मासातील उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार या काळात दान केल्याने पापातून मुक्ती मिळते. सुख समृद्धीसाठी भगवान विष्णुंची उपासना करावी. गरीब आणि गरजू लोकांना पिवळ्या वस्तूंचं दान करावं. यात चणे, गुळ, कपडे दान करावे. तसेच गरीबांना भोजन दिल्यास शुभ फळ मिळतं.

नोकरी आणि व्यवसायत अडचण असेल चातुर्मासात छत्री, कपडे, अन्न आणि कापुराचं दान करावं. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात. तसेच आपल्या इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे. चातु्र्मासात नियमितपणे विष्णु सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!