AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महादेवाचे असे मंदिर ज्यावर डाकूंची होती अतुट श्रद्धा, श्रावण महिन्यात घालत नसत दरोडा

डाकू ठोकिया श्रावण महिन्यात सोमनाथ मंदिरात भिक्षूचा वेश धारण करून महादेवाची पूजा केली होती. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात ठोकिया आणि त्याच्या टोळीने मारामारी करून लोकांना लुटत नसत, कारण..

महादेवाचे असे मंदिर ज्यावर डाकूंची होती अतुट श्रद्धा, श्रावण महिन्यात घालत नसत दरोडा
चित्रकुट येथील मंदिर Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 23, 2023 | 1:58 PM
Share

चित्रकुट : बुंदेलखंडच्या चित्रकूटमध्ये नेहमीच दरोडेखोरांची दहशत असते. या भूमीवर अनेक नावाजलेले व मोठे दरोडेखोर झाले आहेत. सर्व डाकू हे भगवान भोलेनाथांचे मोठे भक्त असायचे. चित्रकूटमध्ये महादेवाचे मंदिर (Chitrakoot Temple) असून ते सोमनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात डाकू श्रावण (Shravan 2023) महिन्यात भगवान शंकराचा आशीर्वाद घेत असत. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सोमनाथ मंदिरात भाविकांची गर्दी असते. 2007 मध्ये पोलिसांना चकमा देत डाकू ठोकियाने स्वतः येथे भगवान भोलेनाथांची रुद्राभिषेक व पूजा केली होती. तेव्हापासून हे ठिकाण अधिक प्रसिद्ध झाले आहे, कारण ज्या ठिकाणी कधीच डाकू पूजा करत नसत तिथे ठोकिया डाकूने स्वतः पूजा केली होती.

डाकू ठोकिया श्रावण महिन्यात सोमनाथ मंदिरात भिक्षूचा वेश धारण करून महादेवाची पूजा केली होती. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात ठोकिया आणि त्याच्या टोळीने मारामारी करून लोकांना लुटत नसत, कारण श्रावण महिना हा भोले शंकराचा असायचा त्यामुळे दरोडेखोर कोणताही गुन्हा करत नसत.

डाकूंनी भोले शंकराची पूजा का केली?

चित्रकूटच्या बारगढ येथील रहिवासी सांगतात की, सोमनाथच्या जंगलात लपण्यासाठी जागा नसल्यामुळे डाकू भोलेनाथची पूजा करत असत. त्यामुळे या मंदिरात पहाटेपासूनच दरोडेखोर पुजेला यायचे. पोलिसांकडे माहिती असूनही काहीही हाती लागले नाही. दरोडेखोर तुरी देऊन पळून जायचे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व डाकू हे भगवान शंकराचे असिम भक्त होते. खडबडीत टेकड्यांमध्ये लपून ते स्वतःला सुरक्षित समजायचे.

चित्रकुटला भगवान रामाचाही इतिहास

चित्रकूट हे हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे  पुरुषोत्तम श्रीरामांनी  देवी सीता आणि लक्ष्मणासोबत साडे अकरा वर्षांचा वनवास घालवला होता. वास्तविक, चित्रकूट- चित्र + कूट शब्दांच्या संयोगाने बनलेले आहे. संस्कृतमध्ये चित्रा म्हणजे अशोक आणि कूट म्हणजे शिखर . या संदर्भात एक म्हण आहे की या वनक्षेत्रात एकेकाळी अशोकाची झाडे मुबलक प्रमाणात आढळून आल्याने याला चित्रकूट असे नाव पडले.

संत तुलसीदास, वेद व्यास, आदिकवी कालिदास इत्यादींनी आपल्या ग्रंथात चित्रकूट म्हणजेच भगवान श्रीरामाचे स्थान वर्णन केले आहे. मंदाकिनी नदीच्या काठी वसलेले हे चित्रकूट धाम प्राचीन काळापासून आपल्या देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक सांस्कृतिक स्थान आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?