AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Datta Jayanti 2023 : दत्त जयंती निमीत्त जाणून घेऊया दत्त महाराजांच्या जन्माची कहाणी

पौराणिक कथेनुसार, एकदा नारदजींनी महर्षी अत्रि मुनींची पत्नी अनुसूया यांच्या पतिव्रतेबाबत कौतुक केले, त्या वेळी देवी सती, देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती देखील तेथे उपस्थित होत्या. नारदजी गेल्यानंतर, तिन्ही देवींनी ऋषी अत्र्यांची पत्नी अनुसूया देवी हिचा धर्म भंग करण्याविषयी चर्चा सुरू केली. देवतांनी त्यांचे पती ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना अनुसूयाच्या धर्माची परीक्षा घेण्यास सांगितले...

Datta Jayanti 2023 : दत्त जयंती निमीत्त जाणून घेऊया दत्त महाराजांच्या जन्माची कहाणी
| Updated on: Dec 26, 2023 | 1:28 PM
Share

मुंबई : भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अंश मानले जातात. भगवान दत्तात्रेयांना गुरु आणि देव या दोन्ही पदव्या देण्यात आल्या आहेत. असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने तिन्ही देव, भगवान शिव, ब्रह्मा आणि विष्णू प्रसन्न होतात आणि तिन्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी होणाऱ्या दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी (Datta Jayanti) दत्तात्रेय महाराजांची कथा वाचण्याचे विशेष महत्त्व मानले जाते.

अशा प्रकारे भगवान दत्तात्रेयांचा झाला जन्म

आधी देवी अनुसूयाने नकार दिला, पण नंतर माता अनुसुयाने त्रिमूर्तीचे रूप परत केले. याच त्रिमुर्तींनी देवी अनुसूयाला आशीर्वाद दिला की ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा एक अंश तुझ्या गर्भातून जन्म घेईल. त्यानंतरच माता अनुसूयाने भगवान दत्तात्रेयांना जन्म दिला. त्याचे नाव दत्त ठेवले. महर्षी अत्र्यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना अत्रेय असे संबोधले गेले, त्यामुळे दत्त आणि आत्रेय यांचे मिश्रण होऊन दत्तात्रेय हे नाव निर्माण झाले. भगवान दत्तात्रेयांची आराधना केल्याने त्रिमूर्ती प्रसन्न होतात, मुलांना आशीर्वाद आणि वैवाहिक जीवनात सुख आणि शांती देतात. अशी धारणा आहे.

भगवान दत्तात्रेयांचा जन्माची कहाणी

पौराणिक कथेनुसार, एकदा नारदजींनी महर्षी अत्रि मुनींची पत्नी अनुसूया यांच्या पतिव्रतेबाबत कौतुक केले, त्या वेळी देवी सती, देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती देखील तेथे उपस्थित होत्या. नारदजी गेल्यानंतर, तिन्ही देवींनी ऋषी अत्र्यांची पत्नी अनुसूया देवी हिचा धर्म भंग करण्याविषयी चर्चा सुरू केली. देवतांनी त्यांचे पती ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना अनुसूयाच्या धर्माची परीक्षा घेण्यास सांगितले. बळजबरीने, तिन्ही देवांनी ऋषींचा वेश धारण केला आणि अनुसूयाची परीक्षा घेण्यासाठी आश्रमात पोहोचले. देवी अनुसूयाने देवांना भिक्षुकांच्या वेशात पाहून भिक्षा आणली परंतु तिन्ही देवतांनी ती स्वीकारण्यास नकार दिला.

त्रिमुर्ती म्हणाले की आम्हाला अन्न खाण्याची इच्छा आहे. त्यावेळी अत्रि मुनी आश्रमात नव्हते, तेव्हा देवी अनुसुयाने त्रिमुर्तींच्या विनंतीला सहमती दिली. त्यावेळी तिन्ही देवतांनी देवी अनुसुया यांना नग्नावस्थेत भोजन देण्यास सांगितले. त्यावेळी देवी अनुसुया खूप क्रोधित झाल्या आणि तिच्या दिव्य दृष्टीने त्यांना त्रिमूर्तीचे सत्य कळले. तिच्या तपश्चर्येच्या जोरावर देवीने तिन्ही ऋषींना सहा महिन्यांच्या बाळांमध्ये रूपांतरित करून आपल्याजवळ ठेवले. त्यांनी त्यांची काळजी घेतली, आणि भोजन दिले, पण पतीपासून विभक्त झाल्यामुळे तिन्ही देवांच्या पत्नी दुःखी झाल्या, मग नारदजींनी त्यांना घडलेली संपूर्ण कथा सांगितली. देवी लक्ष्मी, देवी सती आणि देवी सरस्वती या तिघांनीही अनुसूयाजवळ जाऊन तिची माफी मागितली आणि तिला त्रिमूर्ती परत करण्यास सांगितले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.