AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या स्वप्नात मृत नातेवाईक येतात? काय आहे संकेत? प्रेमानंद महाराजांनी सांगितला अर्थ

अनेकदा आपल्या स्वप्नामध्ये मृत नातेवाईक येतात, अशा स्वप्नाचा नेमका काय अर्थ असतो? असं स्वप्न काय संकेत देतं? याबाबत प्रेमानंद महाराज यांनी मार्गदर्शन केलं आहे.

तुमच्या स्वप्नात मृत नातेवाईक येतात? काय आहे संकेत? प्रेमानंद महाराजांनी सांगितला अर्थ
जर तुम्ही हे पैसे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी दान करता, तेव्हा तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
| Updated on: Jun 29, 2025 | 1:10 PM
Share

प्रेमानंद महाराज यांचे जगभरात करोडो फॉलोअर्स आहेत. ज्यामध्ये अनेक दिग्गज लोकांचा समावेश आहे. स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील प्रेमानंद महाराज यांचे भक्त आहेत. अनेक भक्त दररोज आपल्या विविध समस्या घेऊन प्रेमानंद महाराज यांच्याकडे येत असतात, महाराज आपल्या भक्तांना त्या समस्यांवरील उपाय सांगतात, असाच एक भक्त प्रेमानंद महाराज यांच्याकडे आपली समस्या घेऊन आला, त्याने महाराजांना प्रश्न विचारला महाराज जर स्वप्नात मृत नातेवाईक आले तर त्या स्वप्नाचा अर्थ काय होतो? काय संकेत मिळतात.

भक्ताच्या या प्रश्नावर प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं की, स्वप्न तीन प्रकारचे असतात, पहिल्या प्रकारामध्ये तुमच्या स्वप्नात मृत नातेवाईक येतात, दुसऱ्या प्रकारामध्ये तुमच्या स्वप्नामध्ये देव आणि साधू-संत येतात तर तिसऱ्या प्रकारचं जे स्वप्न असतं त्याचा कोणताच अर्थ निघत नाही.

प्रेमानंद महाराज यांनी पुढे म्हटलं की, सामान्यपणे व्यक्तीचं मन अनेक व्यक्तींसोबत, गोष्टींसोबत जोडलं गेलेलं असतं. अनेकदा असं होत की व्यक्तीचं मन ज्या लोकांसोबत जोडलं गेलेलं आहे, ते व्यक्ती जिंवत असतील किंवा मृत त्याच्या स्वप्नात येतात. जर मृत व्यक्ती तुमच्या स्वप्नात आले तर काळजी करण्याचं कारण नाही, याचा अर्थ हा बिलकूल होत नाही की तुम्ही काही तरी चुकीचं केलं आहे, वाईट केलं आहे, असं काहीच नसतं, त्यामुळे भीतीचं काहीही कारण नाही, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.

स्वप्नात मृत व्यक्ती आल्यास काय करावं?

प्रेमानंद महाराज म्हणतात जर तुमच्या स्वप्नात अशी व्यक्ती येत असेल तर दान-पुण्याची सवय लावा. दररोज दान करणं अधिक लाभदायी असतं. तुम्ही अन्न आणि पाण्याचं दान करा, जर तुम्ही अन्न आणि पाणी दान केलं तर ते तुमच्या पूर्वजापर्यंत पोहोचतं. जर तुम्ही दान केलं तर तुमच्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो.

याच कारणामुळे पिंडदान देखील केलं जातं. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये वडीलधारे माणसं जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे, आणि त्यांच्या मृत्यूनंतर दान-पुण्य करावं असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.