AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dev Uthani Ekadashi 2021 | लग्नाचे मुहूर्त काढताय?, मग 6 गोष्टी नक्की लक्षात घ्या, नाहीतर येतील अनेक अडथळे

विवाह हा सनातन धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक मानला जातो. लग्नाची गाठ बांधल्यानंतर, वधू आणि वर दोघांचे जीवन पूर्णपणे बदलते. अशा परिस्थितीत जीवनात कोणतीही त्रासदायक परिस्थिती उद्भवू नये म्हणून शुभ मुहूर्त पाहूनच लग्न करणे अत्यंत आवश्यक आहे.

Dev Uthani Ekadashi 2021 | लग्नाचे मुहूर्त काढताय?, मग 6 गोष्टी नक्की लक्षात घ्या, नाहीतर येतील अनेक अडथळे
marriage
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 2:24 PM
Share

मुंबई : काार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशी Dev Uthani Ekadashi Importance साजरी करण्यात येते. वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये या एकादशीचे व्रत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. या एकादशी व्रताचे वर्णन महाभारताच्या कथेतही आढळते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते. यानंतर युधिष्ठिराने एकादशीचे व्रत विधिवत पूर्ण केले. एकादशीचे हे व्रत पूर्ण केल्यानंतर पापांपासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात.एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळल्यास त्याचे सर्व अशुभ संस्कार नष्ट होऊन मोक्षप्राप्ती होते, असे पुराणांमध्ये सांगितले आहे. याच दिवशी भगवान विष्णू त्यांच्या निद्रेमधून जागे होताता. म्हणून या एकादशीला विषेश महत्त्व प्राप्त झाले आहे.

या दिवशी लग्न, मुंडण, यांसारख्या शुभ कार्यांचे मुहूर्तही या दिवसानंतर काढले जातात. विवाह हा सनातन धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक मानला जातो. लग्नाची गाठ बांधल्यानंतर, वधू आणि वर दोघांचे जीवन पूर्णपणे बदलते. अशा परिस्थितीत जीवनात कोणतीही त्रासदायक परिस्थिती उद्भवू नये म्हणून शुभ मुहूर्त पाहूनच लग्न करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही देवोत्थान एकादशी किंवा त्यानंतरच्या कोणत्याही तिथीला लग्न करण्याचा विचार करत असाल तर मुहूर्त काढताना या गोष्टी लक्षात ठेवा.

1. शास्त्रामध्ये एकूण 27 नक्षत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू शास्त्रानुसार 27 नक्षत्रांपैकी 10 नक्षत्रांमध्ये लग्नाचे मुहूर्त काढू नये. यामध्ये अर्द, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती. याशिवाय गुरूच्या नवमांशात सूर्य सिंह राशीत जात असला तरी लग्न करू नये.

2. पूर्व दिशेला उगवल्यानंतर शुक्र तीन दिवस बाल्यावस्थेत राहतो. या काळात, तो पूर्ण परिणाम देण्यास सक्षम नाही, त्याचप्रमाणे जेव्हा तो पश्चिम दिशेला असतो तेव्हा तो 10 दिवस बालपणात असतो. दुसरीकडे, जेव्हा शुक्र पूर्वेला मावळतो, तेव्हा तो मावळण्यापूर्वी 15 दिवस निकाल देऊ शकत नाही आणि पश्चिमेला मावळण्यापूर्वी 5 दिवस वृद्धावस्थेत असतो. अशा परिस्थितीत लग्नासाठी मुहूर्त काढणे फारसे योग्य नाही.

3. बृहस्पतीच्या वृध्दापकाळात 15-15 दिवस दोन्ही दिशेला असतो, मग तो उगवतो किंवा मावळतो. या काळात विवाह संपन्न करण्याचे काम करू नये. त्याचप्रमाणे अमावस्येच्या तीन दिवस आधी आणि नंतर तीन दिवसांपर्यंत चंद्राचा मूलकाळ असतो. यावेळी विवाह कार्य करू नये. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की शुक्र, गुरु आणि चंद्र यांपैकी कोणतेही ग्रह बालपणात असतील तर त्याला पूर्ण शुभफळ प्राप्त होत नाही. तर वैवाहिक जीवनासाठी हे तीन ग्रह शुभ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

4. जर तुमचा मुलगा घरातील सर्वात मोठा मुलगा असेल, आणि त्याचा जोडीदारही त्याच्या घरात मोठा असेल, तर असा विवाह शुभ मानला जातो.

5. दोन खऱ्या बहिणींचे लग्न एका मुलाशी होऊ नये किंवा दोन सख्या भावांनी दोन खऱ्या बहिणींशी लग्न करू नये. याशिवाय दोन सख्खे भाऊ किंवा बहिणीचे लग्नही एकाच वेळी करू नये. जुळ्या भावांनी जुळ्या बहिणींशी लग्न करू नये. पण यामध्ये लग्नाच्या वेळी सावत्र भावांचे लग्न केले जाऊ शकते.

6. मुलीचे लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांच्या कालावधीत सख्या भावाचे लग्न करता येते, परंतू पुत्रानंतर मुलीचे लग्न 6 महिन्यांच्या आत होत नाही. असे करणे अशुभ मानले जाते.

इतर बातम्या : 

Akshay Navami 2021| आवळा नवमी म्हणजे काय? आवळा नवमी कधी असते, जाणून घ्या व्रताची विधी आणि कथा

Chhath Puja 2021 | सुखी संसारासाठी, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आज सूर्याला वाहिला जाणार अर्घ्य

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कधीही विसरु नका, आयुष्यातील अडचणी सहज दूर होतील

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.