AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: सूर्यग्रहणामुळे यंदा अशी साजरी होणार दिवाळी, जाणून घ्या मुहूर्त

यंदा दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण आल्याने लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्ताबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. जाणून घेऊया नेमका मुहूर्त कधी आहे.

Diwali 2022: सूर्यग्रहणामुळे यंदा अशी साजरी होणार दिवाळी, जाणून घ्या मुहूर्त
Diwali 2022Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 20, 2022 | 5:36 PM
Share

मुंबई, दिवाळी (Diwali 2022) हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो, मात्र यावेळी अमावस्येला सूर्यग्रहण (solar eclipse) होणार आहे. ग्रहण काळात कोणताही सण किंवा शुभ कार्य केले जात नाही. अशा परिस्थितीत दीपावलीचा सण कधीपासून साजरा होणार? याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. जाणून घेऊया दिवाळीचा सण नेमका कोणत्या मुहूर्तावर साजरा होणार आहे. तसेच सूर्यग्रहांची वेळ काय असणार आहे.

सूर्यग्रहण केव्हा आहे?

सूर्यग्रहणाची वेळ – 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 04.29 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 05.42 वाजता समाप्त होईल. सुतक काळ ग्रहणाच्या आधी आणि नंतरचा असतो. सूर्यग्रहण भारतासोबतच जगातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. त्याचा परिणाम भारतात फारच अंशत: होईल असे जोतिष तज्ज्ञांचे मत आहे.

दिवाळी सोमवार, 24 ऑक्टोबर रोजी साजरी केली आहे, या दिवशी प्रदोष अमावस्या आहे आणि 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होईल. पंचांगाच्या फरकामुळे 25 ऑक्टोबरला अमावस्याही असेल. पण दीपावली ही रात्रीची पूजा आहे आणि 24 ऑक्टोबरला संध्याकाळी अमावस्या सुरू होणार आहे, त्यामुळे 24 ऑक्टोबरलाच दीपावली देशभरात साजरी केली जाईल.

कधी साजरी होणार दिवाळी

चतुर्दशी तिथी 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:29 पर्यंत राहील, त्यानंतर अमावास्या सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबरपर्यंत राहील. त्यामुळे  24 ऑक्टोबरला दीपावलीचा सण रात्रभर साजरा करता येईल. दिवाळीची पूजा अमावस्या तिथीच्या रात्रीच केली जाते. ही रात्रीची पूजा आहे आणि ही तारीख 25 ऑक्टोबरच्या रात्री असेल. म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी 05:29 पासून दिवाळीचा सण साजरा केला जाऊ शकतो.

लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त

प्रदोष काळ संध्याकाळी 6 ते 8.32, वार्षिक लग्न 7.14 ते 9.11 पर्यंत आणि सिंह लग्न मध्यरात्री 1.42 ते 3.57 पर्यंत करता येते, दुसऱ्या दिवशी ग्रहण मोक्षाच्या आधी सूर्यास्त होतो.  हा भ्रष्ट काळ मानला जाईल. त्याचे सुतक 12 तास आधी 25 तारखेला पहाटे 4.31 वाजता सुरू होईल, जे दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सुटेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.