AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: धनत्रयोदशीला झाडणीचे हे पाच उपाय करेल सर्व आर्थिक समस्या दूर

धनत्रयोदशीला केलेल्या काही उपायांमुळे घरात लक्ष्मी टिकून राहते. विशेष म्हणजे या उपायांसाठी फार पैसे देखील खर्च करावे लागत नाही.

Diwali 2022:  धनत्रयोदशीला झाडणीचे हे पाच उपाय करेल सर्व आर्थिक समस्या दूर
धनतेरस उपाय Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 21, 2022 | 11:54 PM
Share

मुंबई, रविवार 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण (Dhanteras Upay) आहे. धनत्रयोदशीला पितळेची आणि चांदीची भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी भांडी खरेदी केल्याने संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदेवाला दिवा दान केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी केलेले काही उपाय खूप फायदेशीर असतात. यामध्ये झाडूशी संबंधित उपाय विशेषतः प्रभावी आहेत. चला जाणून घेऊया झाडूशी संबंधित या उपायांविषयी, जे धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी केले जातात.

धनत्रयोदशीला करा झाडूचे हे उपाय

  1. ज्योतिषशास्त्रानुसार झाडूचा संबंध धनाची देवी लक्ष्मीशी आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा. या दिवशी झाडू दान करणे देखील खूप शुभ मानले जाते.
  2. पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी तीन झाडू खरेदी करा त्यापैकी एक मंदिरात चुपचाप ठेऊन या. असे मानले जाते की यामुळे सर्व प्रकारचे आर्थिक त्रास दूर होतात.
  3. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करा आणि त्याच झाडूने संपूर्ण घर स्वच्छ करा. वापरल्यानंतर, हा झाडू कुठेतरी लपवून ठेवा जेथे लोक पाहू शकत नाहीत.
  4. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू आणा पण जुना झाडू फेकून देऊ नका. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी जुन्या झाडूची पूजा करा. यानंतर नवीन झाडूची पूजा करा आणि घरात सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा.
  5. जुन्या झाडूला काळा धागा बांधा आणि तो दाराच्या मागे ठेवा. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. झाडू हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून  झाडूचा अनादर करणे म्हणजे संपत्तीची देवी लक्ष्मीचा अनादर करणे होय. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.