AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: धनत्रयोदशीला घरी आणा या चार वस्तू, शास्त्रात सांगितले आहे महत्त्व

धनत्रयोदशी हा दिवाळीतला महत्त्वाचा सण आहे. शास्त्रानुसार या दिवशी काही वस्तू खरेदी केल्याने खरात सुख-समृद्धी नांदते.

Diwali 2022: धनत्रयोदशीला घरी आणा या चार वस्तू, शास्त्रात सांगितले आहे महत्त्व
भगवान धन्वन्तरी Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 20, 2022 | 10:35 PM
Share

मुंबई, अगदी दोन-तीन दिवसांवर धनत्रयोदशीचा (Dhanteras 2022) सण आलेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनाच्या (Samudramanthan) वेळी भगवान धन्वंतरी (Bhagwan Dhanwantari) हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. भगवान धन्वंतरी हे देखील श्री हरीचे रूप मानले जाते. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात. याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या म्हणजेच दक्षिण  दिशेने दिवा लावण्याची प्रथा आहे. शास्त्रानुसार असे मानले जाते की, धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या काही वस्तू खरेदी केल्या जातात, त्या वस्तू वर्षभर घरात समृद्धी आणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात.

1. भांडी

धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे, परंतु बहुतेकांना कोणती धातूची भांडी खरेदी करावी हे माहित नाही. जर तुम्हाला शंका असेल तर पितळेची भांडी खरेदी करा आणि ती तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवा.

2. गुंतवणूक करावी 

धनत्रयोदशीच्या दिवशी गुंतवणूक करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी धनाशी संबंधित जी काही कामे केली जातात, ती सर्व पूर्ण होतात आणि त्याच वेळी शुभ परिणामही प्राप्त होतात.

3. धणे

या दिवशी धने खरेदी करण्याचीही परंपरा आहे. धनत्रयोदशीला धने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. देवी लक्ष्मीला पूजेत धने अर्पण करून नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवावे. तसेच या दिवशी कुंडीत किंवा अंगणात  कोथिंबीर पेरावी.

4. चांदी

या दिवशी चांदी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. वास्तविक, चांदी हे चंद्राचे प्रतीक मानले जाते. चंद्र मनाला शांती आणि शीतलता देतो. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करता येते.

5. पणती 

धनत्रयोदशीला यमाला दिवा दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मुख्य दरवाजावर 13 दिवे लावावेत.  तसेच दक्षिण दिशेला देखील दिवा लावावा. शास्त्रात दक्षिण दिशेला यमाची दिशा म्हणतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.