AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी केलेल्या या उपायांनी घरात वर्षभर राहील लक्ष्मीचा वास

जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटांचा सामना करीत असाल तर दिवाळीच्या दिवशी हे उपाय नक्की करा.

Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी केलेल्या या उपायांनी घरात वर्षभर राहील लक्ष्मीचा वास
Diwali Upay 2022Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 22, 2022 | 10:03 PM
Share

मुंबई,  दिवाळी (Diwali 2022) हा पाच दिवसांचा सण आहे, जो धनत्रयोदशीपासून (Dhanteras 2022) सुरू होतो. धनत्रयोदशीपासून दीपावलीपर्यंत लक्ष्मीच्या पूजेला (Diwali Upay) विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रात दिवाळीसोबत काही उपाय सांगितले आहेत. दिवाळीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यावर हे उपाय केल्यास देवी लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहील. ज्या घरांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथे लक्ष्मी कायम असते. महिलांचा आदर केला जातो तिथेच लक्ष्मी टिकते. घरात जर कायम आर्थिक चणचण राहत असेल तर दिवाळीच्या दिवशी काही उपाय केल्याने लाभ होतो. जाणून घेऊया या उपायांबद्दल.

  1. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी अवश्य काढावी, फुले आणि दिव्यांनी आपली घर सजवावे. देवी लक्ष्मीच्या कायम निवासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वच्छता ठेवावी.
  2. आर्थिक चाचणीतून बाहेर निघण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी दिवाळीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठा. घराच्या बाहेर आणि आतला प्रसार स्वच्छ करा. मुख्य प्रवेशद्वाराजवळ चप्पल ठेवू नका.
  3.  

    दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर चांदीच्या भांड्यात कापूर जाळून लक्ष्मीची पूजा करावी. असे केल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.

  4.  

    दिवाळीच्या संध्याकाळी वटवृक्षाच्या खोडाला गाठ बांधल्याने आर्थिक समस्येतून मार्ग निघतो. याशिवाय दिवाळीच्या दिवशी घराच्या सर्व दिशेला दिवे लावा. असे केल्याने घरातील गरिबी दूर होते.

  5.  

    दिवाळीच्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मीची पूजा करणार आहेत, त्या ठिकाणी चार तोंडी दिवा लावावा. आम्ही  चतुर्मुखी दिवा चारही दिशांचे प्रतीक आहे आणि तो प्रज्वलित केल्याने  घरामध्ये चारही दिशांनी धन, सुख आणि समृद्धी येते. हा दिवा रात्रभर तेवत ठेवा.

  6.  

    देवी लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे पूजास्थानी 7, 11 आणि 13 कवड्या ठेवाव्यात. दुस-या दिवशी ती उचलून  तिजोरीत ठेवावीत. यामुळे तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.