AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2023 : चौदा वर्षांच्या वनवासानंतर राम जेव्हा अयोध्येत परतले, तेव्हा त्यांनी पहिले कोणाची भेट घेतली?

चौदा वर्षांचा वनवास भोगून प्रभू राम अयोध्यानगरीत परतले तेव्हा अयोध्यावासीयांची मने आनंदाने भरून आली. करुणेचा महासागर असलेल्या आपल्या प्रिय श्री रामाचे अयोध्येत आगमन साजरे करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी त्या रस्त्यावर फुलांची उधळण केली होती आणि ठिकठिकाणी दिव्यांच्या रांगा लावल्या होत्या.

Diwali 2023 : चौदा वर्षांच्या वनवासानंतर राम जेव्हा अयोध्येत परतले, तेव्हा त्यांनी पहिले कोणाची भेट घेतली?
श्रीरामImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 02, 2023 | 9:12 AM
Share

मुंबई : दिवाळी (Diwali 2023) हा हिंदू धर्माच्या श्रद्धेशी निगडित एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. हा सण प्रकाशाचा सण आहे, विजयाचा सण आहे, देदीप्यमान दिवाळीचा सण संपूर्ण भारताच्या श्रद्धेचा सण आहे. त्रेतायुगातील चौदा वर्षांचा वनवास संपवून भगवान राम आपल्या साकेत धाम अयोध्येत परतले तेव्हा दिवाळीचा पहिला सण अयोध्या शहरात साजरा करण्यात आला. अयोध्येला येण्यापूर्वी प्रभू राम कोणाला भेटले आणि त्रेतायुगात प्रभू राम अयोध्येला पोहोचले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांचे स्वागत कसे केले? दिवाळीचा आगामी सण लक्षात घेऊन आज आपण राम युगात डोकावणार आहोत.

भाऊ भरतच्या भेटीसाठी आतूर होते श्रीराम

जेव्हा प्रभू राम वनवासासाठी अयोध्या सोडून गेले. तेव्हा त्यांचा प्रिय बंधू भरत याने नवस घेतला आणि श्रीरामाला सांगितले की, तुझा भाऊ भरत आजपासून हे व्रत घेतो की जोपर्यंत तू चौदा वर्षे वनवासात राहशील, तोपर्यंत तुझ्या कल्याणासाठी मी चौदा वर्षे अयोध्येतील नंदीग्राममध्ये राहीन आणि तपश्चर्या करीन. भरतने श्रीरामाला सांगितले की जर तुम्ही चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून शेवटच्या दिवशी अयोध्येला आला नाही तर तुमचा भाऊ भरत प्राणाची आहुती देईल. श्रीरामांनी आपल्या प्रिय बंधू भरतला मनापासून मिठी मारली आणि म्हणाले की भरत, मी वचन देतो की, माझ्या वडिलांनी दिलेल्या आज्ञेनुसार चौदा वर्षांचा वनवास संपवून मी अयोध्येला येईन. जेव्हा प्रभू राम चौदा दिवसांचा वनवास संपवून अयोध्येला येत होते तेव्हा सर्वप्रथम ते अयोध्येतील नंदीग्राममध्ये आपला भाऊ भरत यांना भेटले आणि त्यांनी आपल्या प्रिय बंधू भरतला प्रेमाने मिठी मारली.  या क्षणाला भरत मिलाप असे म्हणतात.

प्रभू राम अयोध्येत परतले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत झाले

चौदा वर्षांचा वनवास भोगून प्रभू राम अयोध्यानगरीत परतले तेव्हा अयोध्यावासीयांची मने आनंदाने भरून आली. करुणेचा महासागर असलेल्या आपल्या प्रिय श्री रामाचे अयोध्येत आगमन साजरे करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी त्या रस्त्यावर फुलांची उधळण केली होती आणि ठिकठिकाणी दिव्यांच्या रांगा लावल्या होत्या. त्यावेळी अयोध्या नगरी संपूर्ण विश्वात सर्वात तेजस्वी बनली होती. घरी परतल्याच्या आनंदात अयोध्येतील लोक मंगल गीत गात होते. रामावर फुलांचा वर्षाव करत होते. अयोध्या नगरीच्या तुलनेत स्वर्गही फिका पडला आहे असे वाटत होते. तो क्षण पाहण्यासारखा होता, या सर्व गोष्टींचे वर्णन रामचरितमानस या ग्रंथात आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.