AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर जळत नाही ‘हा’ अवयव, कारण…

हिंदू धर्मात मृतदेहाला अग्नी दिला जातो. मुखाग्नी दिल्यानंतर मृतदेहाचे पार्थिव पूर्णतः जळून खाक होते, फक्त अस्थी शिल्लक राहतात. पण तुम्हाला माहितीये का? आपल्या शरीराचा एक असा अवयव आहे, जो मुखाग्नी दिल्यानंतरही जळत नाही.

अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर जळत नाही 'हा' अवयव, कारण...
Burn During Cremation
| Updated on: Jan 20, 2025 | 8:15 PM
Share

Burn During Cremation : मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि जे कोणीही टाळू शकत नाही. जो व्यक्ती जन्माला येतो, तो व्यक्ती कधी ना कधी मरण पावतो. आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख कोणीही व्यक्त करु शकत नाही. यामुळे त्या व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी त्याच्यावर योग्य पद्धतीनं अंत्यसंस्कार होणे आवश्यक असते. प्रत्येक धर्मात माणसाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्याची पद्धती ही वेगळी असते. सर्वसामान्यपणे हिंदू धर्मात मृतदेहाला अग्नी दिला जातो. मुखाग्नी दिल्यानंतर मृतदेहाचे पार्थिव पूर्णतः जळून खाक होते, फक्त अस्थी शिल्लक राहतात. पण तुम्हाला माहितीये का? आपल्या शरीराचा एक असा अवयव आहे, जो मुखाग्नी दिल्यानंतरही जळत नाही.

पार्थिवाचा एक अवयव मात्र जळत नाही

हिंदू धर्मात, जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. यावेळी मृतदेह चितेवर ठेवून अग्नी दिला जातो. यामुळे काही तासांत शरीरातील अवयवाची जळून राख होते. मुखाग्नी दिल्यानंतर पार्थिव शरीराच्या हाडांचीही राख होते. यानंतर फक्त अस्थी शिल्लक राहतात. मृताच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पार्थिव अनंतात विलीन झाल्यावर शिल्लक राहिलेल्या अस्थी एका मातीच्या भांड्यात जमा करून नदीमध्ये विसर्जित केल्या जातात. पण त्यावेळी पार्थिवाचा एक अवयव मात्र जळत नाही. तो तसाच राहतो. विशेष म्हणजे हे संशोधनातून सिद्ध झालं आहे.

दातांवर आगीचा काहीच परिणाम होत नाही

पार्थिवाला 670 ते 810 अंश सेल्सिअस तापमानात मुखाग्नी दिल्यानंतर काही तासात शरीर नष्ट होते. मानवी शरीर संपूर्ण जळून जाण्यासाठी साधारणतः दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. माणसाचे शरीर जळून राख झाले तरी त्याचे दात मात्र जळत नाहीत. पार्थिव जळाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थींमध्ये तुम्ही दात हे अगदी सहज ओळखू शकता. यामागील कारण म्हणजे, माणसाचे दात कॅल्शियम फॉस्फेटपासून तयार होतात. त्यामुळे दातांवर आगीचा काहीच परिणाम होत नाही. यामुळे संपूर्ण पार्थिव जळून खाक झाल्यानंतरही दात मात्र तसेच राहतात. यासाठी कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावे नाही.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....