AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुभकार्यापूर्वी दही-साखर का खाल्ली जाते? यामागचं विज्ञान ऐकून थक्क व्हाल!

दही-साखर ही केवळ एक पारंपरिक प्रथा नाही, तर आरोग्यदायी सवय आहे. यामागे विज्ञान आहे, जे तणाव, पचन आणि ऊर्जा या तिन्ही महत्त्वाच्या अंगांशी संबंधित आहे. त्यामुळे पुढच्या वेळी कुठलाही मोठा दिवस सुरू करताना दही-साखर खाल्लं, तर ते केवळ शुभ नसेल, तर शरीरासाठीही हितकारक ठरेल!

शुभकार्यापूर्वी दही-साखर का खाल्ली जाते? यामागचं विज्ञान ऐकून थक्क व्हाल!
Curd SugarImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: May 22, 2025 | 8:32 PM
Share

भारतीय संस्कृतीमध्ये कोणतंही शुभकार्य, परीक्षा, नवीन काम किंवा प्रवास सुरू करण्याआधी दही-साखर खाण्याची परंपरा आहे. अनेकांना वाटतं की हा केवळ एक धार्मिक किंवा पारंपरिक संकेत आहे. पण यामागे फक्त श्रद्धा नाही, तर विज्ञानदेखील आहे. दही आणि साखर एकत्र खाण्याचे फायदे आरोग्याशी निगडित असून, यामागे शरीराला मिळणारी ऊर्जा आणि मानसिक स्थिरतेचा खोल संबंध आहे.

भारतात दही-साखर खाणं हे शुभ मानलं जातं. विशेषतः परीक्षा देण्यापूर्वी, नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा कोणत्याही मोठ्या कामासाठी घराबाहेर पडताना आई दही-साखर खायला देते. हा संकेत ‘गोड सुरुवात’ या भावनेशी जोडलेला आहे. गोड खाल्ल्याने शुभ घडतं, अशी अनेकांची भावना असते. परंतु या परंपरेला केवळ धार्मिक दृष्टीकोन न देता, तिच्या पाठीमागील वैज्ञानिक कारणे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

साधारणतः परीक्षा, मुलाखत किंवा मोठ्या कामांपूर्वी आपल्याला तणाव जाणवतो. अशा वेळी शरीराला झपाट्याने ऊर्जा देणाऱ्या अन्नाची गरज असते. साखर म्हणजे ग्लुकोजचा एक महत्त्वाचा स्रोत, जो मेंदूसाठी त्वरित ऊर्जा पुरवतो. दुसरीकडे, दही हे प्रोबायोटिक फूड आहे, जे पचन सुधारतं आणि शरीराला थंडावा देतं. त्यामुळे दही-साखर खाल्ल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि शरीर उत्साही राहतं.

अनेक वैज्ञानिक अभ्यासांनी दाखवले आहे की दहीमध्ये ‘लॅक्टोबॅसिलस’ नावाचे जीवाणू असतात, जे आतड्यांतील बॅक्टेरिया संतुलित ठेवण्यास मदत करतात. तणावाच्या काळात पाचन प्रणाली बिघडते, पण दहीमुळे ती संतुलित राहते. त्यात साखर मिसळल्याने झटपट ऊर्जा मिळते, जे एखाद्या महत्त्वाच्या क्षणी उपयुक्त ठरतं.

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात उष्णतेमुळे त्रास होतो, अशावेळी दही शरीरातील उष्णता कमी करतं. साखरेमुळे ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे प्रवासाच्या किंवा उन्हात बाहेर पडण्याच्या वेळी दही-साखर खाणं शरीराला थंड आणि स्फूर्तीदायक ठेवतं.

रोज दही-साखर खाणं पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. दह्यामुळे जठरातील अॅसिडिटी कमी होते आणि साखरेमुळे अन्न सहजपणे पचते. विशेषतः जेव्हा आपण रिकाम्या पोटी एखादं काम सुरू करतो, तेव्हा दही-साखर एक उत्तम पर्याय ठरतो.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.