
आपल्या सर्वांच्या घरामध्ये संध्याकाळी देवासमोर दिवा लावतो आणि घरामध्ये अगरबत्ती आणि धूप पेटवतो. घरामध्ये संध्याकाळी तूपाचा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक होते आणि त्यासोबतच घरातील सदस्य आनंदी राहातात. हिंदू धर्मामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन केल्यामुळे तुमच्या घरामधील सदस्यांचे वाद कमी होण्यास मदत होते. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीचे विशेष स्थान आहे. या भौतिक जगात प्रत्येकाला लक्ष्मीची आवश्यकता असते. जीवन जगण्यासाठी धन आणि अन्नाची आवश्यकता असते, ज्याची देवी लक्ष्मी आहे. प्रत्येकाला आपल्या घरी लक्ष्मी यावी असे वाटते.
धार्मिक मान्यतेनुसार, घरामध्ये संध्याकाळी तूपाचा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी देवीता वास राहातो. ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या घरात धन आणि समृद्धीची कमतरता नसते. तिजोरी नेहमीच भरलेली असते आणि घरात नेहमीच आनंद असतो. पण देवी लक्ष्मी कोणाच्या घरात राहते आणि घरात येण्यापूर्वी ती कोणत्या गोष्टींकडे पाहते? लोकांचा असा विश्वास आहे की घरात प्रवेश करण्यापूर्वी देवी लक्ष्मी काही गोष्टींकडे नक्कीच पाहते.
घरात प्रवेश करण्यापूर्वी, देवी लक्ष्मी घर किती स्वच्छ आणि नीटनेटके आहे हे निश्चितपणे तपासते. देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. ज्या घरात अव्यवस्था आणि घाण असते तिथे देवी लक्ष्मी वास करत नाही.
देवी लक्ष्मीला घरात शांती, प्रेम आणि सकारात्मकता आवडते. जिथे घरात राहणारे लोक परस्पर प्रेमाने राहतात, जिथे कोणताही संघर्ष नसतो, त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो.
ज्या घरात देवाची पूजा केली जाते आणि दररोज दिवा लावला जातो त्या घरात लक्ष्मी माता वास करते.
ज्या घरात तुळशी आणि गायीची पूजा केली जाते ते घर लक्ष्मी कधीही सोडत नाही.
ज्या कुटुंबात कपट, फसवणूक आणि अनैतिक कृत्ये होत नाहीत, त्या कुटुंबात लक्ष्मी दीर्घकाळ वास करते.
ज्या घरात प्रवेशद्वार स्वच्छ, सजवलेले असते आणि त्यावर माळ असते, तिथे लक्ष्मी देवी वास करते.