पलंगावर, खुर्चीवर बसल्यावर तुम्हालाही पाय हलवण्याची सवय आहे का? मग हे वाचाच
अनेकांना बसल्या बसल्या सतत पाय हलवण्याची सवय असते. पण अनेकांना हे माहित नसेल की ही सवय धार्मिक तसेच मानसिकदृष्टीने देखील चुकीचे लक्षण मानले जाते. तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊयात की, पाय हालवणे शुभ असते की अशुभ असते.

अनेकांना आपण पाहिलं असेल की ते खुर्चीवर, पलंगावर किंवा अगदी ट्रेन,बसमध्ये देखील बसल्यानंतर कितीतरी वेळ पाय हलवताना दिसत असतात. काही लोक तर जेवताना किंवा झोपतानाही त्यांचे पाय हलवत राहतात, तेव्हा घरातील मोठी माणसे ओरडतानाही पाहिलं असेल. कारण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही सवय नक्कीच चांगली नसते. तसेच तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊयात. पाय हालवणे शुभ असते की अशुभ? किंव त्याचे काय परिणाम होतात ते.
कुंडलीतील चंद्राच्या स्थानावर नकारात्मक परिणाम
ज्योतिषशास्त्रानुसार, बसल्यावर पाय हलवल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्राच्या स्थानावर नकारात्मक परिणाम होतो. चंद्र आपल्या मनाचे आणि मानसिक शांतीचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा चंद्र कमकुवत असतो तेव्हा जीवनात तणाव, चिंता आणि मानसिक अशांतता असते. यामुळे घरात शांत वातावरण निर्माण होऊ शकते आणि आजारपण येऊ शकते.
मानसिक आणि शारीरिक कमकुवतपणा
जेव्हा एखादी व्यक्ती बसल्या बसल्या सतत पाय हलवते असते तेव्हा त्याचा त्याच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. ही सवय मानसिक कमकुवतपणा आणि निर्णय घेण्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. परिणामी, एखादी व्यक्ती आत्मविश्वास गमावू शकते आणि निर्णय घेण्याबाबत आत्मविश्वास बाळगू शकत नाही.
घरात पैशाची कमतरता
सतत पाय हलवण्याच्या या सवयीमुळे घरात पैशाची कमतरता आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीने ही सवय पाळली तर ती पैशाच्या आवकमध्ये अडथळा निर्माण करू शकते आणि भाग्याच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकते.
पूजेचे अशुभ परिणाम
जर तुम्ही पूजा करताना बसून पाय हलवत असाल तर ही सवय पूजेच्या परिणामांवर नकारात्मक परिणाम करू शकते. पूजेसाठी मानसिक शांती आणि भक्ती आवश्यक असते. परंतु पाय हलवल्याने ही एकाग्रता बिघडते. तसेच पूजेत व्यत्यय येऊ शकतो. परिणामी, पूजेचे अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही.
जेवताना पाय हलवण्याची सवय
काही लोकांना जेवताना खुर्चीवर बसून पाय हलवण्याची सवय असते. या वाईट सवयीचा घरातील आनंद, शांती आणि समृद्धीवरही परिणाम होतो. विशेषतः जेवताना पाय हलवणे हे अन्नदेवतेचा अपमान मानला जातो. ज्यामुळे आर्थिक समस्या आणि आर्थिक टंचाई निर्माण होऊ शकते.
त्यामुळे पाय हलवण्याची सवय ही धार्मिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्याही चांगले लक्षण मानले जात नाही.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
