ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या राशीनुसार ‘या’ गोष्टी दान करा…..
Jyeshtha Purnima Daan: सनातन धर्मात पौर्णिमा तिथी खूप महत्वाची मानली जाते. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा तिथी खूप महत्वाची मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी राशीनुसार काही वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

हिंदू धर्मामध्ये आमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवसाला विषेश महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, पौर्णिमेला विशेष पद्धतीनं दान केले जाते. पंचांगानुसार, यावेळी ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा 11 जून रोजी आहे. पौर्णिमा तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. असे म्हटले जाते की या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने लोकांना शुभ फळे मिळतात. दुसरीकडे, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून आणि दान केल्याने जीवनात सुख-शांती राहते. या दिवशी वट सावित्री पौर्णिमा व्रत देखील पाळले जाते. अशा परिस्थितीत ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीचे महत्त्व वाढते. दुसरीकडे, या दिवशी राशीनुसार काही विशेष वस्तू दान केल्याने व्यक्तीला इच्छित फळ मिळू शकते.
पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, पौर्णिमेच्या दिवशी भगगवान विष्णूची पूजा केली जाते. असे केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि देवाचा तुम्हाला आशिर्वाद मिळतो. पौर्णिमा तिथीच्या दिवशी चंद्राची पूजा करणे खूप चांगले आहे. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी ७:४१ वाजता असेल. या वेळी भाविक अर्घ्य अर्पण करून चंद्राची पूजा करू शकतात.
तुमच्या राशीनुसार ‘या’ गोष्टी दान करा…
मेष राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेला पूजा केल्यानंतर खीर दान करावी. असे केल्याने व्यक्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते असे मानले जाते.
वृषभ राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना दही किंवा तूप दान करावे. असे मानले जाते की असे करणे अत्यंत शुभ आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात समृद्धी येते.
मिथुन राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेला पांढऱ्या वस्तू विशेषतः दूध आणि तांदूळ दान करावेत. असे मानले जाते की असे करणाऱ्यांना करिअर आणि व्यवसायात प्रगती होते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
कर्क राशीच्या लोकांनी त्यांच्या ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी गुळाचे दान करावे. असे म्हटले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या ग्रहांशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात.
तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी तांदळाची खीर नक्कीच दान करावी. असे मानले जाते की असे करणाऱ्यांना देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते आणि त्यांना वर्षभर कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
वृश्चिक राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाच्या वस्तू दान कराव्यात.
धनु राशीच्या लोकांनी या दिवशी डाळींचे दान करावे. असे म्हटले जाते की जो व्यक्ती असे करतो त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते. जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखांपासून आणि दोषांपासून मुक्ती मिळविण्यासाठी, मकर राशीच्या लोकांनी या दिवशी वाहत्या पाण्यात तांदळाचे दाणे वाहू द्यावेत.
कुंभ राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी गरिबांना अन्नदान करावे. असे मानले जाते की यामुळे आर्थिक समस्या दूर होतात. यासोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो.
मीन राशीच्या लोकांनी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करणे शुभ असते. असे म्हटले जाते की असे करणाऱ्या व्यक्तीवर देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
