AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kala Dhaga : काळा धागा बांधण्याचे आहेत अनेक फायदे, हे नियम पाळणेही आहे आवश्यक

काळा धागा (Kala Dhaga) ही फॅशन नसून तो दृष्ट नजरेपासून बचावासाठी  पायाला बांधलो जाते. याशिवाय काळ्या धाग्यामुळे अनेक फायदे होतात.

Kala Dhaga : काळा धागा बांधण्याचे आहेत अनेक फायदे, हे नियम पाळणेही आहे आवश्यक
काळा धागाImage Credit source: Social Media
| Updated on: May 25, 2023 | 10:05 AM
Share

मुंबई : तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, काही लोकं त्यांच्या पायाला आणि हाताला काळा धागा बांधतात. काही लोकांना असे वाटते की फॅशन म्हणून काळा धागा बांधला जातो. मात्र काळा धागा (Kala Dhaga) ही फॅशन नसून तो दृष्ट नजरेपासून बचावासाठी  पायाला बांधलो जाते. याशिवाय काळ्या धाग्यामुळे अनेक फायदे होतात. जाणकार सांगतात की, काळा धागा धारण केल्याने पत्रिकेतील शनी बलवान होतो आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते. मात्र यासाठी काही नियमही पाळणे आवश्यक आहे.

काळा धागा बांधण्याचे नियम

1. जाणकारांच्या मते ज्या हाताला किंवा पायात काळा धागा बांधला असेल, त्या हातात दुसरा रंगाचा धागा बांधू नये. जेव्हा तुम्ही काळा धागा बांधाल तेव्हा त्यात 9 गाठी बांधा.

2. काळा धागा बांधताना शुभ मुहूर्ताची काळजी घ्यावी. यासाठी तुम्हाला ज्योतिषाशी संपर्क साधावा लागेल. काळा धागा वाईट नजरेपासून रक्षण करतो आणि जीवनातील समस्या दूर करतो.

3. घरातील कोणताही सदस्य किंवा मूल वारंवार आजारी पडत असेल आणि त्याचा आजार औषधाने बरा होत नसेल तर त्याच्या कंबरेला काळा दोरा बांधावा. यामुळे मुलाचे आजार बरे होतील आणि उपचाराचा लाभ लवकरच मिळेल.

4. शास्त्राचे जाणकार सांगतात की, काळा धागा घाला बांधल्यानंतर रोज गायत्री मंत्राचा जप करावा. घराच्या दारावर काळ्या धाग्यात लिंबू आणि मिरची लटकवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारीत.

5. जर तुमच्या मुलाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर मुलाच्या पायावर काळा धागा बांधा, असे केल्याने बाळ कमी आजारी पडेल.

राहू-केतू आणि शनीच्या महादशापासून होतो बचाव

पत्रिकेतील कोणत्याही ग्रहांचा प्रभाव कमजोर असेल तर व्यक्तीच्या जीवनात समस्या सुरू होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायावर काळा धागा बांधल्याने शनीची महादशा, साडेसाती आणि अडिचकीचा प्रभाव कमी होतो. यासोबतच पत्रिकेत शनि ग्रहाला बळ मिळते. पत्रिकेत राहु-केतू कमजोर असेल तर ज्योतिषी पायात काळा धागा बांधण्याचा सल्ला देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.