AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवता का? मग हे वाचाच, अन्यथा होईल नुकसान

काहीजणांच्या गरात आपण पाहिलं असेल की बाथरुमचा दरवाजा हा उघडा असतो. पण ते करणं योग्य नाही. कारण बाथरुमचा दरवाजा उघडा ठेवणे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने तर नुकसानकारक आहेच पण सोबतच वास्तूशास्त्राच्या दृष्टीने देखील नुकसानकारक आहे.

तुम्हीही बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवता का? मग हे वाचाच, अन्यथा होईल नुकसान
Keep Bathroom Door Closed, Vastu Shastra & Health RisksImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2025 | 3:52 PM
Share

वास्तुशास्त्रात जसे घराबाबत काही नियम सांगितलले आहेत. त्याचपद्धतीने बाथरूमच्या दाराशी संबंधित देखील काही नियम सांगितले आहेत. जसं की आतापर्यंत तुम्ही तुमच्या बाथरुमचे दाप उघडं ठेवत असला तर नुकसान करून घेत आहात. वास्तुशास्त्रात बाथरूमची दिशा, टॉयलेट सीट इत्यादींना खूप महत्त्व असते. चुकीच्या दिशेने बांधलेले बाथरूम घरात मोठा वास्तुदोष निर्माण करते. यामुळे पैशाचे देखील नुकसान होते, गरिबी वाढते, घरात भांडणे आणि वाद होतात. घरातील सदस्य वारंवार आजारी पडू लागतात. बाथरूम-टॉयलेटच्या दाराबद्दलही वास्तूशास्त्रात नक्की काय सांगितले जाते तसेच बाथरुमचे दार जास्त वेळ उघडे करून ठेऊ नये असे का म्हटले जाते हे जाणून घेऊयात.

बाथरूमच्या दाराशी आणि त्याच्या दिशेशी संबंधित काही नियम आहेत.

बाथरूमच्या दाराशी आणि त्याच्या दिशेशी संबंधित काही नियम आहेत. बाथरूम बांधल्यानंतरही एखादी व्यक्ती अनेकदा अशा चुका करते, ज्यामुळे वास्तुदोष होऊ शकतात. अनेकदा आपण हे पाहिले असेलच की काही लोकांना बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवण्याची सवय असते. जर तुम्हीही जाणूनबुजून किंवा नकळत ही चूक करत असाल तर आता तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद का ठेवावा?

घराच्या या कोपऱ्यात सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते. म्हणूनच असे म्हटले जाते की ही जागा वेळोवेळी स्वच्छ ठेवली पाहिजे. येथे साचणाऱ्या घाणीमुळे संपूर्ण घरात हळूहळू या नकारात्मक उर्जेा वाढली जाते. म्हणूनच बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवण्याची सूचना दिली जाते. जे लोक जाणूनबुजून किंवा नकळत बाथरूमचा दरवाजा नेहमी उघडा ठेवतात. त्यांना केवळ त्यांच्या घरात समस्यांना तोंड द्यावे लागत नाही तर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातही अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. वास्तुशास्त्रानुसार, बाथरूम ही अशी एक जागा आहे जिथे नकारात्मक उर्जेची सर्वात जास्त कंपने निर्माण होतात. अशा परिस्थितीत संपूर्ण घराचे वातावरण असंतुलित होऊ लागते.

या गोष्टींकडेही लक्ष द्या

वास्तुशास्त्रानुसार, बाथरूमबाबत काही इतर नियम आहेत ज्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. बाथरूममध्ये ओलसरपणा असल्यास तो ताबडतोब दुरुस्त करावा कारण यामुळे वास्तुदोष देखील होतो. नकारात्मकता टाळण्यासाठी, येथे नेहमी फ्रेशनर वापरावे. तसेच, बाथरूमच्या भिंतींचा रंग देखील हलका असावा. तसेच बाथरुममधील नळ बिघडले असतील त्यातून सतत पाणी टपकत असेल तर ते सर्वात आधी दुरुस्त करावं. कारण त्यामुळे आर्थिक अडचणी येतात असं म्हटलं जातं.

आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक परिणाम

बाथरुमचे दार केवळ उघडे ठेवल्याने वास्तूशास्त्रानुसार नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देकील धोकादायकच आहे. कारण बाथरूम कितीही स्वच्छ वाटत असलं तरी देखील सर्वात जास्त संसर्ग आणि आजार तिथूनच पसरतात. कारण बाथरुममधून अनेक सुक्ष्म जीव बाहेर पडत असतात. त्यामुळे नक्कीच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.