खरमास लवकरचं संपणार, ‘या’ तारखेपासून होणार शुभकार्यांना सुरूवात..

Kharmas 2025 End Date: मार्चमध्ये 14 मार्चपासून खरमास सुरू झाला. हिंदू धर्मात, खरमासचा काळ शुभ कार्यांसाठी शुभ मानला जात नाही. अशा परिस्थितीत, या काळात सर्व शुभ कार्ये करण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत, एप्रिलमध्ये खरमास कधी संपेल आणि कोणत्या दिवसापासून सर्व शुभ कार्ये सुरू होतील चला जाणून घेऊया.

खरमास लवकरचं संपणार, या तारखेपासून होणार शुभकार्यांना सुरूवात..
Kharmas 2025
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Apr 10, 2025 | 3:35 PM

सध्या, खरमास सुरू आहे, जो 14 मार्च रोजी सुरू झाला. हिंदू धर्मात, खरमासचा काळ शुभ कार्यांसाठी शुभ मानला जात नाही. खरमास सुरू होताच लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, मुंडन, नामकरण समारंभ आणि इतर सर्व शुभ कार्ये निषिद्ध आहेत. म्हणून, संपूर्ण महिनाभर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार, थरमासच्या दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य केल्यामुळे त्यांच्या मध्ये अजथळे येतात त्यासोबतच त्या काळामध्ये तुमची प्रगती होत नाही. खरमासच्या दिवसांमध्ये शुभकार्य केल्यामुळे त्या शुभकार्यामध्ये नकारात्मकता वाढू शकते. या काळात वातावरणामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होते ज्याचा तुमच्या आयुष्यावर प्रभाव पडू शकतो.

ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी वाढते आणि सकारात्मक गोष्टी घडतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. खरमास वर्षातून दोनदा येतो आणि एक महिना टिकतो. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती असेही म्हणतात. एप्रिलमध्ये खरमास कधी संपेल आणि कोणत्या दिवसापासून सर्व शुभ कार्ये सुरू होतील चला जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रात, सूर्य देवाला ग्रहांचा राजा मानले जाते आणि तो पित्याच्या बाजूचे प्रतिनिधित्व करतो. अशा परिस्थितीत, त्यांच्या तेजात घट होणे हे मांगलिकांसाठी शुभ मानले जात नाही. त्याच वेळी, जेव्हा सूर्य मीन किंवा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचे तेज कमी होते. म्हणून, खरमास दरम्यान कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य करणे शुभ मानले जात नाही. 13 एप्रिल रोजी रात्री 3:21 मिनिटांनी सूर्य देव मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत, खरमास 13 एप्रिल 2025 रोजी संपेल. यानंतर, 14 एप्रिलपासून पुन्हा एकदा लग्न, गृहप्रवेश आणि सर्व शुभकार्ये सुरू होतील. हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकार्य शुभ मुहूर्त पाहून केले जातात. सुभवेळी चांगले काम केल्यामुळे तुमच्या कामामध्ये सकारात्मक गोष्टी घडू शकतात. एप्रिलमध्ये लग्नासाठी 9 शुभ दिवस असतात. एप्रिलमध्ये लग्नासाठी शुभ तारखा आहेत – 14, 16, 18, 19, 20, 21, 25, 29 आणि 30 एप्रिल. या तारखांना, पंडितांच्या सल्ल्याने तुम्हाला शुभ मुहूर्त मिळू शकतो.

खरमासमध्ये काय करू नये….

  • शुभ कार्ये – खरमास काळात लग्न, गृहप्रवेश, मुंज, नामकरण यांसारखी शुभ कार्ये टाळावी लागतात.
  • तामसी अन्न – तामसी अन्नपदार्थ आणि मद्यपान टाळावे.
  • नवीन खरेदी – नवीन वाहन, घर किंवा जमीन खरेदी करणे टाळावे.
  • वादविवाद – वादविवाद करणे टाळावे.

खरमासमध्ये काय करावे?

  • सूर्यदेवाची पूजा – दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा.
  • दानधर्म – गरजूंना अन्न, वस्त्र, इत्यादी दान करा.
  • आध्यात्मिक साधना – या काळात ध्यान, जप आणि भक्तीवर लक्ष केंद्रित करा.
  • पवित्र नद्यांमध्ये स्नान- खरमासदरम्यान पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्त्व आहे.
  • टॉईल्स आणि फॅब्रिक खरेदी टाळा – या काळात नवीन कपडे, दागिने, घरे, वाहने आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकता आणि त्यांचा वापर करू शकता.