AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

kaal bhairav jayanti 2021 | मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता हवी आहे, मग काल भैरवाची आराधना करा, जाणून घ्या विधी

काल भैरव हे भगवान शंकराचे एक रुद्र रुप आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमीचे व्रत केले जाते. काल भैरव जयंती मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते.

kaal bhairav jayanti 2021 | मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता हवी आहे, मग काल भैरवाची आराधना करा, जाणून घ्या विधी
Kaal-Bhairav-janyani
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : काळ भैरव हे भगवान शंकराचे एक रुद्र रुप आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमीचे व्रत केले जाते. काल भैरव जयंती मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते. कालभैरव जयंतीची पूजा केल्याने अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते, असे म्हणतात. या वर्षी शनिवार 27 नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने तंत्र, मंत्र,नजर लागणे यांसारख्या गोष्टी नष्ट होतात, अशी मान्यता आहे. भैरव जयंतीच्या दिवशी पूजेमध्ये काल भैरव चालीसा पाठ कोल्याने आयुष्यातील बऱ्याच वाईट गोष्टी नष्ट होतात. जिथे ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठे आहेत, तिथे कालभैरवाला स्थान मिळाले आहे. काल भैरवाचे अस्तित्व वैष्णो देवी, उज्जैनचे महाकालेश्वर, विश्वनाथ मंदिर या ठिकाणी पाहायला मिळते.

काळ भैरवाची कहाणी पुराणांमध्ये अशी मान्यता आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांमध्ये एकदा श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाले. तेव्हा, ब्रह्मदेवाने शिव यांचा अपमान केला. यामुळे, रागाने शिवाने रुद्र रूप धारण केले आणि काळ भैरव त्यांच्या याच रूपात जन्मला. काळ भैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले. यामुळे भैरव यांच्यावर ब्रह्म हत्येचा आरोप झाला.  पापातून मुक्त होण्यासाठी शिवाने काल भैरव यांना प्रायश्चित्त करण्यास सांगितले. काळ भैरवाने प्रायश्चित्त म्हणून त्रिलोक भ्रमण केले. पण, काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्म हत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. तेव्हापासून काशीमध्ये काळ भैरवची स्थापना झाली आणि शहराला कोतवाल म्हटले जाऊ लागले.

काळ भैरव जयंती पूजा शुभ मुहूर्त मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमी तिथी शनिवार 27 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 5:43 वाजता सुरू होईल आणि रविवार, 28 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 6:00 वाजता समाप्त होईल.

अशी करा पुजा अष्टमीच्या दिवशी व्रत करावे. आंघोळानंतर स्वच्छ कपडे घालावून भगवान शंकरासमोर दिवा लावावा आणि पूजा करावी. या दिवशी भैरव मंत्राचा 1008 वेळा जप करावा.

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)

संबंधित बातम्या :

Friday Lakshmi Mantra | आयुष्य आर्थिक संकटांनी वेढलेलं आहे, देवी लक्ष्मीच्या या मंत्रांचा जप करा

येणाऱ्या नवीन वर्षात या 4 गोष्टी घरी आणा, घरामध्ये सुख समृद्धी नक्की नांदेल

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...