AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीकृष्णाच्या नगरीत शनिदेवाचं एक असं सिद्ध मंदिर जिथे डोकं टेकताच दूर होतात सर्व संकट, शनिची वक्रदृष्टीही पडत नाही

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कधीतरी शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. शनिच्या साडेसातीदरम्यान व्यक्तीला अनेक शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावे लागतात. असे म्हणतात की, साडेसतीच्या वेळी शनि पापींना कठोर शिक्षा करतो. दुसरीकडे, शनिदेवबद्दल असेही म्हटले जाते की एखाद्याने कधीही त्यांच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघू नये. कारण, त्याxची दृष्टी वक्र आहे ज्यामुळे एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते

श्रीकृष्णाच्या नगरीत शनिदेवाचं एक असं सिद्ध मंदिर जिथे डोकं टेकताच दूर होतात सर्व संकट, शनिची वक्रदृष्टीही पडत नाही
Shanidev temple in Mathura
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 8:17 AM
Share

मुंबई : आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कधीतरी शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. शनिच्या साडेसातीदरम्यान व्यक्तीला अनेक शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावे लागतात. असे म्हणतात की, साडेसतीच्या वेळी शनि पापींना कठोर शिक्षा करतो. दुसरीकडे, शनिदेवबद्दल असेही म्हटले जाते की एखाद्याने कधीही त्यांच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघू नये. कारण, त्याxची दृष्टी वक्र आहे ज्यामुळे एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते (Kokilavan Dham Shanidev Temple Near Mathura Know The Story Of This Auspicious Place).

पण, भगवान श्रीकृष्णाची नगरी मथुराच्या नांदगावमध्ये शनिदेव यांचे असे एक परिपूर्ण मंदिर आहे जिथे शनिदेव यांच्या वक्र दृष्टीचा परिणाम होत नाही. असेही मानले जाते की जर साडेसतीच्या त्रासाने ग्रस्त असलेली एखादी व्यक्ती सात शनिवारी येथे येऊन शनिदेवला मोहरीचे तेल अर्पण करेल तर शनिदेवचा त्यांच्यावरील क्रोध नष्ट होतो. तर इतरांच्या जीवनातील सर्व समस्या केवळ शनिदेवांच्या दर्शनाने दूर होतात.

हे मंदिर कोकिलावन धाम म्हणून ओळखले जाते. मान्यता आहे की येथे भगवान श्रीकृष्णाने शनिदेवांनी कोकिळेच्या रुपाने दर्शन दिले. या मंदिराशी संबंधित सर्वकाही जाणून घ्या.

मान्यता काय?

शनिदेव भगवान श्रीकृष्णाचे परम भक्त होते. द्वापरयुगात, जेव्हा श्रीकृष्ण वृंदावनमध्ये आपल्या बाल रुपात लीला करत होते, तेव्हा देवाचे बाल स्वरुप पाहण्यासाठी सर्व देवता वृंदावन येथे आले होते. त्यावेळी शनिदेव देखील आपल्या आराध्य दैवताला पाहण्यासाठी तेथे आले. परंतु वक्रदृष्टीमुळे त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन करण्यापासून रोखण्यात आले. मग श्रीकृष्णाने शनिदेव यांना संदेश दिला की त्यांनी नंद गावाजवळील जंगलात तपश्चर्या करावी तिथेच त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन घडेल.

यानंतर शनिदेवांनी तेथे तपश्चर्या केली. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण तेथे कोकिळेच्या रुपात प्रकट झाले. तसेच, शनिदेव यांना सांगितले की त्यांनी आता इथेच रहावे. आपल्या आराध्य दैवताच्या आदेशानंतर शनि तेथेच विराजमान झाले. त्यानंतर श्रीकृष्णाने सांगितले की आजपासून हे स्थान कोकिलावन धाम म्हणून ओळखले जाईल आणि जो कोणी येथे येऊन शनिदेवांचे दर्शन करेल त्यावर कधीही शनिदेवाची वक्र दृष्टी पडणार नाही. तसेच, भाविकांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. या मंदिरात शनिदेव यांच्यासह श्रीकृष्ण आणि राधारानी देखील विराजमान आहेत.

या मंदिरात शनिवारी खूप गर्दी असते

शनिदेवांच्या या मंदिरात शनिवारी बरीच गर्दी असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे भाविक येतात आणि कोकिलावनात प्रथम चतुर्थांश परिक्रमा करतात, त्यानंतर सूर्यकुंडात स्नान करतात आणि शनिदेवाची पूजा करतात. मान्यता आहे की, शनिदेव येथे येणाऱ्या भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. मोठ्या विश्वासाने भाविक त्यांच्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्याचे निवेदन घेऊन कोकिलावन धाम येथे येतात.

Kokilavan Dham Shanidev Temple Near Mathura Know The Story Of This Auspicious Place

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

शनिचे दुष्परिणाम, राहू-केतूच्या वक्रदृष्टीपासून वाचायचं असेल तर शनिवारचा उपवास करा, जाणून घ्या पद्धत आणि महत्व आणि फायदे

Saturday Astro Tips | शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी ‘या’ वस्तू दान करा

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.