AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Krishna Janmashtami 2022: स्मार्त आणि वैष्णव जन्माष्टमीतले अंतर, जन्माष्टमीच्या दोन तिथी का?

मुळात जन्माष्टमी पंथानुसार सलग दोन दिवस येतात. वैष्णव संप्रदाय आणि स्मार्त संप्रदाय हे दोन वेगवेगळे कृष्ण पंथ आहेत. जेव्हा जन्माष्टमी तिथी सामान्य असते तेव्हा वैष्णव संप्रदाय आणि स्मार्त संप्रदाय दोन्ही समान तिथी पाळतात आणि एकाच दिवशी साजरी करतात. पण..

Krishna Janmashtami 2022: स्मार्त आणि वैष्णव जन्माष्टमीतले अंतर, जन्माष्टमीच्या दोन तिथी का?
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 18, 2022 | 1:01 PM
Share

Krishna Janmashtami 2022: कृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सवाचा सण. भगवान विष्णूने भगवान श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतल्याने हिंदूंमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. द्वापार युगातील (Dwapar Yug) मथुरा नगरीमध्ये (Mathura) पाच हजार वर्षांपूर्वी मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. कृष्ण जन्माष्टमी हा एक लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित सण आहे आणि संपूर्ण भारतभर गोकुळाष्टमी, सातम आथम, श्री कृष्णाष्टमी, श्री कृष्ण जयंती आणि अष्टमी रोहिणी अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. यानिमित्ताने मंदिरं सजवली जातात. भगवान श्रीकृष्णाची स्तुती करण्यासाठी भजन कीर्तन केले जातात, घंटा वाजवली जातात, शंखनाद केला ​​जातो आणि संस्कृत स्तोत्रे गायली जातात. भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत यावेळी विशेष आध्यात्मिक मेळावे आयोजित केले जातात. संपूर्ण भारतातून यात्रेकरू या उत्सवात सहभागी होतात. परंतु कृष्ण जन्माष्टमी अनेकदा 2 दिवस साजरी केली जाते, एक दिवस स्मार्त आणि दुसरा वैष्णव. स्मार्त आणि वैष्णवांची जन्माष्टमी वेगवेगळ्या दिवशी का येते याबद्दल जाणून घेऊया.

कृष्ण अष्टमीच्या दोन तिथी का आहेत?

मुळात जन्माष्टमी पंथानुसार सलग दोन दिवस येतात. वैष्णव संप्रदाय आणि स्मार्त संप्रदाय हे दोन वेगवेगळे कृष्ण पंथ आहेत. जेव्हा जन्माष्टमी तिथी सामान्य असते तेव्हा वैष्णव संप्रदाय आणि स्मार्त संप्रदाय दोन्ही समान तिथी पाळतात आणि एकाच दिवशी साजरी करतात. पण जर तारखा वेगळ्या असतील तर स्मार्त पंथ पहिल्या तारखेला आणि वैष्णव पंथ नंतरच्या तारखेला जन्माष्टमी साजरी करतात.

जन्माष्टमीची तारीख 18 आणि 19 ऑगस्ट

अष्टमी तिथी रात्री 09:20 पासून सुरू होते (18 ऑगस्ट)

अष्टमी तिथी रात्री 10:59 वाजता संपेल (19 ऑगस्ट)

निशीथ (रात्री) पुजेच्या वेळा (18 ऑगस्ट) रात्री 11:59 ते दुपारी 12:42 पर्यंत.

शास्त्रानुसार परानाची वेळ

परान वेळ 19 ऑगस्ट रोजी रात्री 10:58 नंतर.

शास्त्रानुसार पर्यायी पराना वेळ

9 ऑगस्ट रोजी सकाळी 05:45 नंतरही करता येईल. यावर्षी वैष्णव कृष्ण जन्माष्टमी 19 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. 19 रोजी उपवास करणाऱ्यांसाठी निशिता पूजनाची वेळ रात्री 11:59 ते 12:43 अशी असेल आणि पारणाची वेळ 20 ऑगस्ट रोजी पहाटे 05:45 नंतर असेल. यंदा दहीहंडी 20 ऑगस्टलाच साजरी केली जाणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल