AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Krishna Janmashtami 2022: स्मार्त आणि वैष्णव जन्माष्टमीतले अंतर, जन्माष्टमीच्या दोन तिथी का?

मुळात जन्माष्टमी पंथानुसार सलग दोन दिवस येतात. वैष्णव संप्रदाय आणि स्मार्त संप्रदाय हे दोन वेगवेगळे कृष्ण पंथ आहेत. जेव्हा जन्माष्टमी तिथी सामान्य असते तेव्हा वैष्णव संप्रदाय आणि स्मार्त संप्रदाय दोन्ही समान तिथी पाळतात आणि एकाच दिवशी साजरी करतात. पण..

Krishna Janmashtami 2022: स्मार्त आणि वैष्णव जन्माष्टमीतले अंतर, जन्माष्टमीच्या दोन तिथी का?
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 1:01 PM

Krishna Janmashtami 2022: कृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सवाचा सण. भगवान विष्णूने भगवान श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतल्याने हिंदूंमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. द्वापार युगातील (Dwapar Yug) मथुरा नगरीमध्ये (Mathura) पाच हजार वर्षांपूर्वी मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. कृष्ण जन्माष्टमी हा एक लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित सण आहे आणि संपूर्ण भारतभर गोकुळाष्टमी, सातम आथम, श्री कृष्णाष्टमी, श्री कृष्ण जयंती आणि अष्टमी रोहिणी अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. यानिमित्ताने मंदिरं सजवली जातात. भगवान श्रीकृष्णाची स्तुती करण्यासाठी भजन कीर्तन केले जातात, घंटा वाजवली जातात, शंखनाद केला ​​जातो आणि संस्कृत स्तोत्रे गायली जातात. भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत यावेळी विशेष आध्यात्मिक मेळावे आयोजित केले जातात. संपूर्ण भारतातून यात्रेकरू या उत्सवात सहभागी होतात. परंतु कृष्ण जन्माष्टमी अनेकदा 2 दिवस साजरी केली जाते, एक दिवस स्मार्त आणि दुसरा वैष्णव. स्मार्त आणि वैष्णवांची जन्माष्टमी वेगवेगळ्या दिवशी का येते याबद्दल जाणून घेऊया.

कृष्ण अष्टमीच्या दोन तिथी का आहेत?

मुळात जन्माष्टमी पंथानुसार सलग दोन दिवस येतात. वैष्णव संप्रदाय आणि स्मार्त संप्रदाय हे दोन वेगवेगळे कृष्ण पंथ आहेत. जेव्हा जन्माष्टमी तिथी सामान्य असते तेव्हा वैष्णव संप्रदाय आणि स्मार्त संप्रदाय दोन्ही समान तिथी पाळतात आणि एकाच दिवशी साजरी करतात. पण जर तारखा वेगळ्या असतील तर स्मार्त पंथ पहिल्या तारखेला आणि वैष्णव पंथ नंतरच्या तारखेला जन्माष्टमी साजरी करतात.

जन्माष्टमीची तारीख 18 आणि 19 ऑगस्ट

अष्टमी तिथी रात्री 09:20 पासून सुरू होते (18 ऑगस्ट)

अष्टमी तिथी रात्री 10:59 वाजता संपेल (19 ऑगस्ट)

निशीथ (रात्री) पुजेच्या वेळा (18 ऑगस्ट) रात्री 11:59 ते दुपारी 12:42 पर्यंत.

शास्त्रानुसार परानाची वेळ

परान वेळ 19 ऑगस्ट रोजी रात्री 10:58 नंतर.

शास्त्रानुसार पर्यायी पराना वेळ

9 ऑगस्ट रोजी सकाळी 05:45 नंतरही करता येईल. यावर्षी वैष्णव कृष्ण जन्माष्टमी 19 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. 19 रोजी उपवास करणाऱ्यांसाठी निशिता पूजनाची वेळ रात्री 11:59 ते 12:43 अशी असेल आणि पारणाची वेळ 20 ऑगस्ट रोजी पहाटे 05:45 नंतर असेल. यंदा दहीहंडी 20 ऑगस्टलाच साजरी केली जाणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?.
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची...
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची....
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू.
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?.
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल.
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू.
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन.