AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lunar Eclipse 2021 : या दोन राशींसाठी हे चंद्रग्रहण ठरणार वाईट, महिनाभर खबरदारी बाळगावी लागेल

2021 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Lunaqr Eclipse 2021) शुक्रवारी, 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा आहे. चंद्रग्रहण ही वैज्ञानिकदृष्ट्या खगोलीय घटना म्हणून पाहिली जात असली तरी ज्योतिषशास्त्रात ती एक अशुभ घटना मानली जाते आणि त्याचा परिणाम सर्व राशींवरही दिसून येतो.

Lunar Eclipse 2021 : या दोन राशींसाठी हे चंद्रग्रहण ठरणार वाईट, महिनाभर खबरदारी बाळगावी लागेल
lunar Eclipse 2021
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 7:45 AM
Share

मुंबई : 2021 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Lunaqr Eclipse 2021) शुक्रवारी, 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा आहे. चंद्रग्रहण ही वैज्ञानिकदृष्ट्या खगोलीय घटना म्हणून पाहिली जात असली तरी ज्योतिषशास्त्रात ती एक अशुभ घटना मानली जाते आणि त्याचा परिणाम सर्व राशींवरही दिसून येतो.

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण चंद्रग्रहणाच्या 15 दिवसांनी होईल. अशा स्थितीत दोन राशीच्या लोकांनी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा प्रभाव जवळपास महिनाभर राहील, त्यामुळे सर्व राशींना महिनाभर काळजी घ्यावी लागेल. येथे जाणून घ्या कोणत्या दोन राशींना या ग्रहणाचा त्रास होऊ शकतो.

वृषभ राशी

19 नोव्हेंबर 2021 रोजी वृषभ राशीत चंद्रग्रहण होणार आहे, तसेच या दिवशी कृतिका नक्षत्र असेल. अशा स्थितीत वृषभ राशीच्या लोकांसाठी काही अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण, त्याचा या राशीवर सर्वाधिक परिणाम होईल. राहू आधीच वृषभ राशीत विद्यमान आहे, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तुम्हाला गोंधळात टाकणाऱ्या परिस्थितीतून जावे लागेल. थोडासा निष्काळजीपणा केला तर चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. ज्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. तसेच यामुळे आर्थिक नुकसानही होऊ शकते.

सिंह राशी

हे ग्रहण कृतिका नक्षत्रात होईल, या नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे, त्यामुळे सूर्याशी संबंधित राशींवर चंद्रग्रहणाचा प्रभाव दिसून येईल. सिंह देखील सूर्याचे चिन्ह आहे. या राशीच्या लोकांच्या करिअरवर वाईट परिणाम दिसून येईल. कामाच्या ठिकाणी बॉससोबत वाद होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शांत राहा. वादविवाद पूर्णपणे टाळा अन्यथा यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते. या ग्रहणाचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे.

भारताच्या या भागांमध्ये ग्रहण दिसेल

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार, हे ग्रहण सकाळी 11 वाजून 34 मिनिटांनी सुरु होईल आणि संध्याकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी संपेल. हे ग्रहण युरोप, अमेरिका, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि ब्रिटनमध्ये स्पष्टपणे दिसणार आहे. भारतात, ते फक्त अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागातच दिसेल. हे चंद्रग्रहण छायाग्रहण असल्याने भारतात सुतक काळाचा प्रभाव राहणार नाही.

संबंधित बातम्या :

Lunar eclipse | शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण, चंद्र लाल का दिसतो? जाणून घ्या चंद्र ग्रहणाबद्दलच्या खास गोष्टी

Chandra Grahan 2021 | दिवाळीनंतर वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण, कधी आणि कुठे दिसणार, जाणून घ्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.