AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Law of Karma : माणसाचे कर्म ठरवते त्याच्या जीवनाची दिशा, असा काम करतो कर्माचा नियम

तुम्ही ही म्हण लहानपणापासून ऐकत असाल - "जे पेरले तेच उगवेल!" हा कर्माचा साधा आणि लोकप्रिय नियम (Law Of Karma Marathi) आहे. या भौतिक जगात प्रत्येक जीव कर्म आणि मृत्यूच्या बंधनाने जखडलेला आहे.

Law of Karma : माणसाचे कर्म ठरवते त्याच्या जीवनाची दिशा, असा काम करतो कर्माचा नियम
कर्माचा सिद्धांतImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 11, 2023 | 4:19 PM
Share

मुंबई : तुम्ही जेव्हा एखादे काम कुठल्यातरी उद्देशाने करता तेव्हा त्याला कर्म म्हणतात. कर्म चांगले आणि वाईट दोन्ही असू शकते. कर्म आपल्या कृतीनुसार त्याचे स्वरूप दर्शविते. कर्म तुम्हाला जीवनाचे महत्त्व समजावून सांगते आणि त्याचे योग्य रीतीने पालन केल्याने कर्म तुमच्या चेतनेला आणि आत्म्याला त्याच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करते. कर्म तुम्हाला सत्याच्या मार्गावर आणते. तुम्ही ही म्हण लहानपणापासून ऐकत असाल – “जे पेरले तेच उगवेल!” हा कर्माचा साधा आणि लोकप्रिय नियम (Law Of Karma Marathi) आहे. या भौतिक जगात प्रत्येक जीव कर्म आणि मृत्यूच्या बंधनाने जखडलेला आहे. मनुष्य जे काही कर्म करतो, त्यातून एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा एकतर सकारात्मक असते किंवा कर्मामुळे निर्माण झालेली ऊर्जा नकारात्मक असू शकते आणि ही ऊर्जा या दैवी आणि अलौकिक विश्वाला तुमच्याबद्दल सांगते.  शेवटी तुम्ही जी काही भावना निर्माण केली असेल त्यानुसार निसर्ग तुम्हाला प्रतिफळ देते.

एखाद्याला कशाची भीती वाटली पाहिजे

कर्माच्या नियमांनुसार माणसाने देवाचे नाही तर स्वतःच्या वाईट कर्मांचे भय बाळगावे. कारण देव तुम्हाला क्षमा करू शकतो. पण तुमची वाईट कृत्ये तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. पुराणानुसार चांगल्या कर्मांच्या सहाय्याने आपण स्वर्गात जाऊ शकतो तर वाईट कर्म करून नरकाच्या यातना सहन कराव्या लागतात.

इंद्रालाही भोगावे लागले होते त्याच्या कृत्याचे परिणाम

कर्म हा आरसा आहे जो आपल्याला आपला खरा चेहरा दाखवतो. कारण माणूस हा त्याच्या सौंदर्याने नाही तर त्याच्या कर्माने महान बनतो. एखाद्या व्यक्तीने नेहमी अशी कृत्ये केली पाहिजेत, जेणेकरून त्याचा कोणाला तरी उपयोग होईल. कर्माचे सामर्थ्य असे आहे की या कारणामुळे इंद्रालाही स्वर्गातील सुखे आणि ऐश्वर्य उपभोगल्यानंतर सत्कर्मांच्या अभावी पुन्हा निरनिराळ्या जन्मांत भटकावे लागले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.