AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्मचार्‍यांना प्रत्येक रेल्वेतून प्रवास मोफत? उत्तर वाचून बसेल धक्का

Railway Employee Pass: रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रत्येक रेल्वेतून मोफत प्रवास करता येतो का? त्यांना देशभरात कुठे गेले तरी तिकिटासाठी पैसे द्यावे लागत नाही का? तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल? काय आहे त्याचे उत्तर? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत याविषयीची मोठी माहिती दिली.

कर्मचार्‍यांना प्रत्येक रेल्वेतून प्रवास मोफत? उत्तर वाचून बसेल धक्का
| Updated on: Jul 31, 2026 | 4:22 PM
Share

रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रत्येक रेल्वेतून मोफत प्रवास करता येतो असा अनेक लोकांचा समज आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही तिकीट लागत नाही असे काहींना वाटते. त्यांनी प्रत्येक दिवशी जरी प्रवास केला तर त्यांना तिकीट लागत नाही. देशभरात ते कुठेही मोफत प्रवास करू शकतात, असा एक समज आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी अनेक प्रकारचे पास देण्यात येतात. पण याचा अर्थ ते कुठेही रेल्वेने मोफत प्रवास करू शकतात असा नाही. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि पास सुविधेची माहिती दिली. त्याविषयीचे नियम स्पष्ट केले.

रेल्वे कर्मचारी (पास) नियम, 1986 अंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे पास देण्यात येतात. यामध्ये प्रिव्हलेज पास, ड्युटी पास, निवृत्तीनंतर कॉम्प्लिमेंट्री पास सारख्या सोयी सुविधा दिल्या जातात. या पासचा फायदा कर्मचारी आणि त्यांच्या पात्र कुटुंबातील सदस्यांना होतो. त्यांना काही ट्रेनमधील प्रवासाचा फायदा होतो.

कोणत्या ट्रेनमध्ये रेल्वे पासला ग्रीन सिग्नल?

वंदे भारत एक्सप्रेस

राजधानी एक्सप्रेस

शताब्दी एक्सप्रेस

दुरंतो एक्सप्रेस

हमसफर एक्सप्रेस

गतिमान एक्सप्रेस

भारतीय रेल्वेनुसार, वंदे भारत आणि गतिमान एक्सप्रेस या शताब्दी श्रेणीच्या समकक्ष ट्रेन आहेत. कर्मचारी कोणत्या बोगीतून प्रवास करू शकतील हे त्यांचे पद, वेतन मर्यादा आणि हुद्दा यावर अवलंबून असते. रेल्वे पास प्रत्येक ट्रेनमध्ये लागू होत नाही. खासकरून लक्झरी आणि टुरिस्ट ट्रेनमध्ये पासचा वापर करता येत नाही.

महाराजा एक्सप्रेस

पॅलेस ऑन व्हील्स

या ट्रेनचे व्यवस्थापन खास करून IRCTC आणि राज्य पर्यटन विकास संस्थांकडून करण्यात येते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना रेल्वे पास नियमांची कोणतीही खास सुविधा दिली जात नाही. अशा रेल्वेत सामान्य प्रवाशांप्रमाणे तिकीट खरेदी करून कर्मचारी प्रवास करू शकतात.

काय आहे पूर्ण नियम?

नियमानुसार, मोफत प्रवासाची सुविधा केवळ ठराविक रेल्वेत मिळते. प्रत्येक रेल्वेत प्रवास करण्याची सुविधा देण्यात येत नाही. लक्झरी आणि पर्यटनशी संबंधित ट्रेनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना तिकीट खरेदी करावे लागते. याशिवाय प्रिव्हिलेज तिकिट ऑर्डरतंर्गत (PTO) रेल्वे कर्मचाऱ्यांना भाडे, किरायाचा एक वाटा म्हणजे जवळपास एक तृतीयांश पेमेंट देय असते.

Follow Us
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...
रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे...
Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा