AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahabharat Story : श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते वास्तूशास्त्रातले हे पाच रहस्य, कधीच भासत नाही आर्थिक चणचण

Mahabharat Story युधिष्ठिराने एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले की, जीवनात सुख आणि समृद्धी कशी प्राप्त होऊ शकते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला काही गोष्टी सांगितल्या आणि सांगितले की या गोष्टी घरात असतील तर जीवनात सुख-समृद्धी येते.

Mahabharat Story : श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते वास्तूशास्त्रातले हे पाच रहस्य, कधीच भासत नाही आर्थिक चणचण
महाभारतImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 08, 2023 | 5:57 PM
Share

मुंबई : महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. महाभारताचे युद्ध (Mahabharat Story) हे सर्वात विनाशकारी युद्ध मानले जाते. ज्यामध्ये कौरवांचे संपूर्ण वंश नष्ट झाले. महाभारत युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. ज्यामध्ये श्रीकृष्ण म्हणाले की, माणसाने नेहमी आपले कर्म केले पाहिजे, परिणामाची चिंता करू नये. युधिष्ठिराने एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले की, जीवनात सुख आणि समृद्धी कशी प्राप्त होऊ शकते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला काही गोष्टी सांगितल्या आणि सांगितले की या गोष्टी घरात असतील तर जीवनात सुख-समृद्धी येते. या गोष्टींना घरामध्ये स्थान देऊन तुम्ही सुख-समृद्धी देखील मिळवू शकता.

या 5 गोष्टी घरात ठेवल्याने सुख-समृद्धी राहते.भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशी व्रत, गणेश चतुर्थीचे व्रत देखील सांगितले होते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की, घरात पाणी, गाईचे तूप, चंदन, वीणा आणि मध असेल तर माणसाचे जीवन नेहमी आनंदी राहते आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते.

पाणी

श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना सांगितले की पाणी हे जीवन आहे. श्रीकृष्णाने सांगितले की, ज्या राज्यात पाण्याची मुबलकता आहे आणि योग्य व्यवस्थापन आहे, तेथे सुख-समृद्धी टिकून राहते. मानवासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. म्हणूनच घरात नेहमी शुद्ध आणि पवित्र पाण्यासाठी योग्य जागा असावी.

चंदन

घरात चंदन ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की, ज्या घरात चंदन असेल तेथे राक्षसी शक्ती प्रवेश करत नाहीत. चंदन वाईट शक्तींपासून रक्षण करते.

गाईचे तूप

श्रीकृष्णाच्या मते जी व्यक्ती गाईची सेवा करतो त्याच्यावर देवताही प्रसन्न होतात. गाईचे तूप अतिशय शुद्ध असते. रोज गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा संपून सुख-समृद्धी राहते.

मध

श्रीकृष्णाने चौथी गोष्ट मध असल्याचे सांगितले. मधामुळे घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. मध घरातील वातावरण दूषित होण्यापासून वाचवते. यामुळे नकारात्मकता नष्ट होते.

वीणा

श्रीकृष्णाने युधिष्ठिराला वीणाची उपयुक्तता सांगितली. वीणा हे माता सरस्वतीचे प्रतीक आहे. सरस्वती ही विद्येची देवी आहे. ज्या घरामध्ये विद्येच्या देवीची पूजा केली जाते, तेथे सुख-समृद्धी कायम असते. त्यामुळे घरात वीणाची उपस्थिती ज्ञानाचे महत्त्व दर्शवते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.