AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahabharat Story : श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते वास्तूशास्त्रातले हे पाच रहस्य, कधीच भासत नाही आर्थिक चणचण

Mahabharat Story युधिष्ठिराने एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले की, जीवनात सुख आणि समृद्धी कशी प्राप्त होऊ शकते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला काही गोष्टी सांगितल्या आणि सांगितले की या गोष्टी घरात असतील तर जीवनात सुख-समृद्धी येते.

Mahabharat Story : श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते वास्तूशास्त्रातले हे पाच रहस्य, कधीच भासत नाही आर्थिक चणचण
महाभारतImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 08, 2023 | 5:57 PM
Share

मुंबई : महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. महाभारताचे युद्ध (Mahabharat Story) हे सर्वात विनाशकारी युद्ध मानले जाते. ज्यामध्ये कौरवांचे संपूर्ण वंश नष्ट झाले. महाभारत युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. ज्यामध्ये श्रीकृष्ण म्हणाले की, माणसाने नेहमी आपले कर्म केले पाहिजे, परिणामाची चिंता करू नये. युधिष्ठिराने एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले की, जीवनात सुख आणि समृद्धी कशी प्राप्त होऊ शकते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला काही गोष्टी सांगितल्या आणि सांगितले की या गोष्टी घरात असतील तर जीवनात सुख-समृद्धी येते. या गोष्टींना घरामध्ये स्थान देऊन तुम्ही सुख-समृद्धी देखील मिळवू शकता.

या 5 गोष्टी घरात ठेवल्याने सुख-समृद्धी राहते.भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशी व्रत, गणेश चतुर्थीचे व्रत देखील सांगितले होते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की, घरात पाणी, गाईचे तूप, चंदन, वीणा आणि मध असेल तर माणसाचे जीवन नेहमी आनंदी राहते आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते.

पाणी

श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना सांगितले की पाणी हे जीवन आहे. श्रीकृष्णाने सांगितले की, ज्या राज्यात पाण्याची मुबलकता आहे आणि योग्य व्यवस्थापन आहे, तेथे सुख-समृद्धी टिकून राहते. मानवासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. म्हणूनच घरात नेहमी शुद्ध आणि पवित्र पाण्यासाठी योग्य जागा असावी.

चंदन

घरात चंदन ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की, ज्या घरात चंदन असेल तेथे राक्षसी शक्ती प्रवेश करत नाहीत. चंदन वाईट शक्तींपासून रक्षण करते.

गाईचे तूप

श्रीकृष्णाच्या मते जी व्यक्ती गाईची सेवा करतो त्याच्यावर देवताही प्रसन्न होतात. गाईचे तूप अतिशय शुद्ध असते. रोज गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा संपून सुख-समृद्धी राहते.

मध

श्रीकृष्णाने चौथी गोष्ट मध असल्याचे सांगितले. मधामुळे घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. मध घरातील वातावरण दूषित होण्यापासून वाचवते. यामुळे नकारात्मकता नष्ट होते.

वीणा

श्रीकृष्णाने युधिष्ठिराला वीणाची उपयुक्तता सांगितली. वीणा हे माता सरस्वतीचे प्रतीक आहे. सरस्वती ही विद्येची देवी आहे. ज्या घरामध्ये विद्येच्या देवीची पूजा केली जाते, तेथे सुख-समृद्धी कायम असते. त्यामुळे घरात वीणाची उपस्थिती ज्ञानाचे महत्त्व दर्शवते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.