AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahabharat Story : इतके दिवस चालले होते महाभारताचे युद्ध, या युद्धात किती जण वाचले?

अर्जुन ज्या रथावर बसून महाभारत युद्ध लढत होता, त्यात श्रीकृष्ण, हनुमानजी आणि शेषनागही होते. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने हनुमानजींना बोलावून रथावर ध्वज घेऊन बसण्याची विनंती केली आणि श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून शेषनागाने अर्जुनाच्या रथाचे चाक धरले, जेणेकरून शक्तिशाली शस्त्रांमुळे रथाला हानी होऊ नये. ही सर्व व्यवस्था श्रीकृष्णाने अर्जुनासाठी केली होती. कारण अर्जुन धर्मासाठी लढत होता.

Mahabharat Story : इतके दिवस चालले होते महाभारताचे युद्ध, या युद्धात किती जण वाचले?
महाभारत Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 24, 2023 | 9:18 AM
Share

मुंबई : महाभारताच्या (Mahabhrat Story Marathi) युद्धाला धार्मिक युद्ध आणि विनाशकारी युद्ध म्हणतात. जे कौरव आणि पांडव यांच्यात घडले. असे म्हणतात की कौरवांच्या महत्वाकांक्षा शिगेला पोहोचल्या होत्या. त्याच वेळी, विदुरासारखे ज्ञानी असूनही राजा धृतराष्ट्राचा मुलगा त्याच्या आसक्तीत इतका मग्न होता की त्याला योग्य- अयोग्यही दिसत नव्हते. जुगारात हरल्यानंतर द्रौपदीचे वस्त्रहरण होत असतानाही सर्वजण उपस्थित सर्वांनी फक्त बघ्यांची भूमिका घेतली होती. महाभारताच्या युद्धात कुरुक्षेत्राच्या मैदानात कौरवांचे अर्धमशी आणि पांडवांचे धर्माशी युद्ध झाले. महाभारत युद्धादरम्यान अशा अनेक विशेष घटना घडल्या ज्या आजही लोकांसाठी शिक्षण, क्षेत्र, संदेश आणि प्रवचन म्हणून काम करतात. गीतेच्या शिकवणीचा उगम महाभारताच्या रणक्षेत्र कुरुक्षेत्रातून झाला असे मानले जाते, जे श्रीकृष्णाला अर्जुनाकडून मिळाले होते. हे युद्ध18 दिवस सलग चालू होते. महाभारताचे  युद्ध केवळ 18 दिवस का चालले याचे कारण शोधण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? चला तर मग जाणून घेऊया यामागचे कारण

महाभारत युद्धाचा 18 क्रमांकाशी काय संबंध?

18 दिवस चाललेले महाभारत युद्ध या क्रमांकाशी जोडलेले आहे. 18 हा महाभारत युद्धाचा सर्वात महत्वाचा क्रमांक आहे. वास्तविक, महाभारत ग्रंथाकडे लक्ष दिले तर त्यात एकूण 18 अध्याय आहेत. आणि हे 18 दिवस भगवान श्रीकृष्णाने रणांगणात अर्जुनला 18 गीतांचं ज्ञानही दिलं.  ज्योतिषी आणि तज्ज्ञांच्या मते, कलियुगाच्या प्रारंभाच्या 6 महिने आधी मार्गशीर्ष शुक्ल 14 रोजी युद्ध सुरू झाले, जे अखंड 18 दिवस चालले. युद्धाच्या शेवटी फक्त 18 लोक उरले.

महाभारताच्या शेवटच्या म्हणजे अठराव्या दिवशी भीम दुर्योधनाच्या मांडीला मारतो, ज्यामुळे दुर्योधनाचा मृत्यू होतो आणि त्यामुळे दुर्योधनाच्या मृत्यूमुळे पांडव विजयी होतात.

महाभारत युद्धानंतर अर्जुनचा रथ का जळून राख झाला?

अर्जुन ज्या रथावर बसून महाभारत युद्ध लढत होता, त्यात श्रीकृष्ण, हनुमानजी आणि शेषनागही होते. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने हनुमानजींना बोलावून रथावर ध्वज घेऊन बसण्याची विनंती केली आणि श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून शेषनागाने अर्जुनाच्या रथाचे चाक धरले, जेणेकरून शक्तिशाली शस्त्रांमुळे रथाला हानी होऊ नये. ही सर्व व्यवस्था श्रीकृष्णाने अर्जुनासाठी केली होती. कारण अर्जुन धर्मासाठी लढत होता.

जेव्हा युद्ध संपले आणि पांडवांचा विजय झाला तेव्हा अर्जुनने भगवान श्रीकृष्णांना सांगितले की आधी तुम्ही रथातून खाली उतरा आणि मग मी खाली उतरेन. यावर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन नाही, तू आधी खाली ये. भगवंताच्या आज्ञेचे पालन करून अर्जुन रथातून खाली उतरला. यानंतर श्रीकृष्णही रथातून खाली उतरले. शेषनागही रथ सोडून पाताळात गेला आणि हनुमानजीही अंतर्धान पावले.

रथातून खाली उतरल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनला काही अंतरावर घेऊन गेले आणि अचानक अर्जुनाच्या रथातून ज्वाळा निघू लागल्या आणि रथ जळून खाक झाला. अर्जुनला आश्चर्य वाटले आणि श्रीकृष्णाला विचारले, हे काय झाले?

कृष्ण म्हणाले- हे अर्जुन! हा रथ फार पूर्वी भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि कर्ण यांच्या दैवी शस्त्रांच्या हल्ल्याने जाळला गेला होता. मात्र हनुमानजी आणि मी ध्वज घेऊन जाणाऱ्या रथावर होतो, माझ्या संकल्पाने रथ पुढे जात होता. आता तुमचे कार्य पूर्ण झाल्यावर मी ते सोडले आणि त्यामुळे हा रथ जळून राख झाला.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं