AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wedding Rituals: लग्नात नवरीच आधी नवरदेवाला हार का घालते? वाचा परंपरा आणि महत्त्व

Marriage Tradition: तुम्ही पाहिले असेल की हार घालण्याच्या विधीमध्ये नवरी प्रथम नवरदेवाला हार घालते आणि नंतर नवरदेव वधूला हार घालतो. यामागे काय कारण आहे याचा तुम्ही विचार केला आहे का? याबाबत सविस्तर माहिती सविस्तर जाणून घेऊयात.

Wedding Rituals: लग्नात नवरीच आधी नवरदेवाला हार का घालते? वाचा परंपरा आणि महत्त्व
Marriage Tradition
| Updated on: Nov 07, 2025 | 11:04 PM
Share

भारतीय संस्कृतीत लग्न करताना अनेक परंपरा पाळल्या जातात. यातील एकमेकांना हार घालण्याची परंपरा ही खास आणि महत्त्वाची आहे. ही केवळ फुलांची देवाणघेवाण नसून एक महत्त्वाचा विधी आहे. याविधीवेळी वधू आणि वर एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार करतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की हार घालण्याच्या विधीमध्ये नवरी प्रथम नवरदेवाला हार घालते आणि नंतर नवरदेव वधूला हार घालतो. यामागे काय कारण आहे याचा तुम्ही विचार केला आहे का? याबाबत सविस्तर माहिती सविस्तर जाणून घेऊयात.

काय आहे इतिहास?

तुम्हाला माहिती असेल की प्राचीन भारतात स्वयंवर नावाची एक परंपरा होती. या परंपरेत पात्र राजपुत्रांना आमंत्रित केले जात असे आणि राजकुमारी तिच्या पसंतीच्या वराला हार घालत असे आणि त्यानंतर त्या दोघांचे लग्न होत असे. हा हार घालण्याचा समारंभ स्वयंवरातील सर्वात महत्वाचा क्षण असायचा कारण ते वधूने निवडलेल्या वराचे प्रतीक होता. त्यामुळे अशीच परंपरा आजही दिसून येते. जेव्हा नवरी नवरदेवाला हार घालते तेव्हा ती जीवनसाथी म्हणून त्याचा स्वीकार करते.

राम-सीता स्वयंवर

रामायणातही याचा संदर्भ आहे, जनकपुरी येथे झालेल्या स्वयंवरात, राजा जनक वरींची परीक्षा आयोजित केली होती. जो व्यक्ती भगवान शिवाचे धनुष्य उचलू शकतो आणि दोरीने बांधू शकतो त्याचे लग्न सीतेशी लाले जाईल असं राजा जनक यांनी म्हटले होते. जेव्हा श्रीरामांनी धनुष्य उचलले आणि तोडले त्यावेळी माता सीतेने रामाच्या गळ्यात हार घातला. तेव्हापासून नवरीवे नवरदेवाला प्रथम हार घालण्याची परंपरा सुरू झाली.

शुभ सुरुवातीचे प्रतीक

हार घालण्यासाठी वधूने पुढाकार घेणे हे शुभ आणि लग्नाच्या आनंदी सुरुवातीचे लक्षण मानले जाते. यामुळे येणारे वैवाहिक जीवन प्रेम, समजूतदारपणा आणि आनंदाने भरलेले असेल असे मानले जाते.

आध्यात्मिक अर्थ काय आहे?

वरमालाचा अर्थ केवळ हार घालणे नसून तो स्वीकृती आणि आदराचे प्रतीक आहे. जेव्हा नवरी नवरदेवाला हार घालते तेव्हा ती त्याला मनापासून स्वीकारते, तसेच जीवनातील सर्व सुख-दुःखात त्याच्यासोबत राहण्याची प्रतिज्ञा करते. तसेच जेव्हा नवरदेव वधूला हार घालतो तेव्हा तो देखील मनापासून तिला स्वीकारतो आणि आयुष्यभर तिच्यासोबत राहण्याची प्रतिज्ञा करतो.

सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व

सध्याच्या काळात शाही विवाहसोहळे आयोजित केले जातात. मात्र यातील हार घालण्याचा समारंभ प्राचीन परंपरांची आठवण करून देतो. या विधीमध्ये नवरी पुढाकार घेते याचा अर्थ लग्नात स्त्रीची संमती सर्वोपरि मानली जाते असा आहे.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष