AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wedding Rituals: लग्नात नवरीच आधी नवरदेवाला हार का घालते? वाचा परंपरा आणि महत्त्व

Marriage Tradition: तुम्ही पाहिले असेल की हार घालण्याच्या विधीमध्ये नवरी प्रथम नवरदेवाला हार घालते आणि नंतर नवरदेव वधूला हार घालतो. यामागे काय कारण आहे याचा तुम्ही विचार केला आहे का? याबाबत सविस्तर माहिती सविस्तर जाणून घेऊयात.

Wedding Rituals: लग्नात नवरीच आधी नवरदेवाला हार का घालते? वाचा परंपरा आणि महत्त्व
Marriage Tradition
| Updated on: Nov 07, 2025 | 11:04 PM
Share

भारतीय संस्कृतीत लग्न करताना अनेक परंपरा पाळल्या जातात. यातील एकमेकांना हार घालण्याची परंपरा ही खास आणि महत्त्वाची आहे. ही केवळ फुलांची देवाणघेवाण नसून एक महत्त्वाचा विधी आहे. याविधीवेळी वधू आणि वर एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार करतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की हार घालण्याच्या विधीमध्ये नवरी प्रथम नवरदेवाला हार घालते आणि नंतर नवरदेव वधूला हार घालतो. यामागे काय कारण आहे याचा तुम्ही विचार केला आहे का? याबाबत सविस्तर माहिती सविस्तर जाणून घेऊयात.

काय आहे इतिहास?

तुम्हाला माहिती असेल की प्राचीन भारतात स्वयंवर नावाची एक परंपरा होती. या परंपरेत पात्र राजपुत्रांना आमंत्रित केले जात असे आणि राजकुमारी तिच्या पसंतीच्या वराला हार घालत असे आणि त्यानंतर त्या दोघांचे लग्न होत असे. हा हार घालण्याचा समारंभ स्वयंवरातील सर्वात महत्वाचा क्षण असायचा कारण ते वधूने निवडलेल्या वराचे प्रतीक होता. त्यामुळे अशीच परंपरा आजही दिसून येते. जेव्हा नवरी नवरदेवाला हार घालते तेव्हा ती जीवनसाथी म्हणून त्याचा स्वीकार करते.

राम-सीता स्वयंवर

रामायणातही याचा संदर्भ आहे, जनकपुरी येथे झालेल्या स्वयंवरात, राजा जनक वरींची परीक्षा आयोजित केली होती. जो व्यक्ती भगवान शिवाचे धनुष्य उचलू शकतो आणि दोरीने बांधू शकतो त्याचे लग्न सीतेशी लाले जाईल असं राजा जनक यांनी म्हटले होते. जेव्हा श्रीरामांनी धनुष्य उचलले आणि तोडले त्यावेळी माता सीतेने रामाच्या गळ्यात हार घातला. तेव्हापासून नवरीवे नवरदेवाला प्रथम हार घालण्याची परंपरा सुरू झाली.

शुभ सुरुवातीचे प्रतीक

हार घालण्यासाठी वधूने पुढाकार घेणे हे शुभ आणि लग्नाच्या आनंदी सुरुवातीचे लक्षण मानले जाते. यामुळे येणारे वैवाहिक जीवन प्रेम, समजूतदारपणा आणि आनंदाने भरलेले असेल असे मानले जाते.

आध्यात्मिक अर्थ काय आहे?

वरमालाचा अर्थ केवळ हार घालणे नसून तो स्वीकृती आणि आदराचे प्रतीक आहे. जेव्हा नवरी नवरदेवाला हार घालते तेव्हा ती त्याला मनापासून स्वीकारते, तसेच जीवनातील सर्व सुख-दुःखात त्याच्यासोबत राहण्याची प्रतिज्ञा करते. तसेच जेव्हा नवरदेव वधूला हार घालतो तेव्हा तो देखील मनापासून तिला स्वीकारतो आणि आयुष्यभर तिच्यासोबत राहण्याची प्रतिज्ञा करतो.

सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व

सध्याच्या काळात शाही विवाहसोहळे आयोजित केले जातात. मात्र यातील हार घालण्याचा समारंभ प्राचीन परंपरांची आठवण करून देतो. या विधीमध्ये नवरी पुढाकार घेते याचा अर्थ लग्नात स्त्रीची संमती सर्वोपरि मानली जाते असा आहे.

Follow Us
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा