AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरू होणार आहे मृत्यू पंचक, या चुका अवश्य टाळा

चंद्र जेव्हा कुंभ आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा पंचक होते. यंदा मृत्यू पंचक मे महिन्यात होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनिवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना मृत्यू पंचक म्हणतात.

सुरू होणार आहे मृत्यू पंचक, या चुका अवश्य टाळा
पंचकImage Credit source: Social Media
| Updated on: May 11, 2023 | 10:02 PM
Share

मुंबई : पंचक हे वैदिक ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानले जाते. हे पाच दिवसांसाठी असते. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 27 नक्षत्रे आहेत. यापैकी शेवटची पाच नक्षत्रे म्हणजे धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपद आणि रेवती. या नक्षत्रांच्या संयोगाला पंचक म्हणतात (What is Panchak). यासोबतच चंद्र जेव्हा कुंभ आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा पंचक होते. यंदा मृत्यू पंचक मे महिन्यात होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनिवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना मृत्यू पंचक म्हणतात. मृत्यूपंचकातील पाच दिवसांत कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबावर किंवा गावावर संकटांचा डोंगर कोसळतो अशी मान्यता आहे. म्हणजेच हा काळ मृत्यूसारखा वाटतो.

कधीपासून होणार सुरूवात

मृत्यू पंचक 13 मे 2023 रोजी सकाळी 12.18 वाजता सुरू होईल आणि 17 मे रोजी सकाळी 7.39 वाजता समाप्त होईल. मृत्युपंचकात छप्पर घालणे, खाट बांधणे अशी कामे करू नयेत. यासोबतच दक्षिण दिशेला प्रवास करणेही टाळावे. असे केल्याने अपघाताचा धोका आहे. या काळात कोणाचा मृत्यू झाल्यास, विशेष विधी केल्यानंतरच मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार केले जातात.

पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांनी विशेष शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करावेत. यासोबतच पाच पुतळे केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत. असे केल्याने अशुभ परिणामांसह कुटुंबातील किंवा गावातील इतर मृत्यू टाळता येतात.

पंचक काळात हे काम करू नये

  1.  पंचक काळात चुकूनही लाकूड खरेदी करू नका. तसेच लाकूड किंवा कोणतेही इंधन गोळा करू नका. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते.
  2. पंचक काळात मृतदेह जाळणे देखील शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की पंचकमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासोबत आणखी 4 लोकांना घेऊन जाते, त्यामुळे पंचकमध्ये मृत्यू झाल्यास 5 कणकीचे पुतळे मृतदेहासोबत ठेवले जातात. जेणेकरून उर्वरित कुटुंबाच्या आरोग्यावर आणि जीवनावर कोणतेही संकट येणार नाही.
  3. पंचक काळात पलंग किंवा खाट बांधणे शुभ मानले जात नाही.
  4. पंचक काळात घराचे छत बसवणेही अशुभ असते. असे घर अशुभ फल देते.
  5. पंचक काळात दक्षिणेकडे प्रवास करणे देखील शुभ मानले जात नाही. या सर्व गोष्टी करायच्या असतील तर काही उपाय करून प्रवास करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.