AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीड हजार जवान, 100 पोलीस अधिकारी, 500 गृहरक्षक, गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांची तयारी

रविवारी विसर्जनानिमित्त शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांसह सशस्त्र पोलीस दलाचे दीड हजार जवान तैनात राहणार आहेत. याशिवाय, अतिरिक्त कुमकही मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 100 अधिकारी, 1500 सशस्त्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन कंपन्या, सीआरपीएफची एक कंपनी, 500 गृहरक्षक, 275 अंमलदार बंदोबस्ताला तैनात असतील.

दीड हजार जवान, 100 पोलीस अधिकारी, 500 गृहरक्षक, गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांची तयारी
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 10:15 AM
Share

मुंबई : दिल्ली, मुंबईसह देशातील काही राज्यांत दहशतवादी हल्ल्यांबाबत देण्यात आलेला इशारा आणि कोरोना प्रसाराचा धोका या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला शनिवारी मुंबईत ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आले. रविवारी विसर्जनानिमित्त शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांसह सशस्त्र पोलीस दलाचे दीड हजार जवान तैनात राहणार आहेत.

याशिवाय, अतिरिक्त कुमकही मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 100 अधिकारी, 1500 सशस्त्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन कंपन्या, सीआरपीएफची एक कंपनी, 500 गृहरक्षक, 275 अंमलदार बंदोबस्ताला तैनात असतील.

चौपाटीवर बॅरिकेड्स आणि मंचासह पोलीस सज्ज

मोठ्या मंडळांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन जुहू चौपाटी आणि मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे होणार आहे. गिरगाव चौपाटीवर बाप्पाच्या निरोप घेण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर सर्व तयारी झाली आहे. पोलीस बॅरिकेड्स आणि मंच बनवण्यात आले आहेत, चकाचक स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच, पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. काही बीएमसी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

बाप्पाच्या निरोप सोहळ्यात कोणतीही अडचण येणार नाही याची महाराष्ट्र सरकारकडून संपूर्ण काळजी घेतली जाईल. गणपती बाप्पाचे विसर्जन करणाऱ्या भक्तांनाही कोरोनाचे नियम पाळावे लागतील. समुद्र किनाऱ्यावर लोक या जयघोषाने गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या किंवा बाप्पाला निरोप देताना दिसतील.

गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त –

यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच आज साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या-

सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत

दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत

संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46

रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)

सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)

अनंत चतुदर्शी तिथी प्रारंभ : सकाळी 05 वाजून 06 मिनिटांनी

अनंत चतुदर्शी तिथी समाप्ती : दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजून 35 मिनिटांनी

गणेश विसर्जन 2021 ची पद्धत

– गणपतीचे विसर्जन करण्यापूर्वी त्यांना नवीन कपडे घाला, फुलांच्या माळेने त्यांना सजवा.

– एक रेशमी वस्त्र घ्या आणि त्यात मोदक, दुर्वा, सुपारी आणि पैसे बांधा

– ही बांधलेली शिदोरी गणपतीच्या मूर्तीसोबत ठेवा.

– गणपतीची पूजा करा, आरती करा आणि कळत नकळत घडलेल्या सर्व चुकांची क्षमा मागा

– जलकुंडाजवळ पोहोचल्यानंतर गणेशाची आरती करा, त्यानंतर पश्चिम दिशेला बांधलेल्या रेशीम कापडाच्या शिदोरीसह मूर्तीचे विसर्जन करा.

संबंधित बातम्या :

Ganesh Visarjan 2021 | आज अनंत चतुर्दशी, जाणून घ्या गणेश विसर्जनाची पद्धत…

अनंत चतुर्दशीची तिथी, शुभ वेळ आणि महत्व जाणून घ्या; विष्णु देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ‘हे’ करा

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.