AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naga Sadhu : अशा प्रकारे होतो नागा साधूंचा अंत्यसंस्कार, हिंदू असूनही दिला जात नाही अग्नि

असे म्हणतात की नागा साधूंचे जीवन खूप कठीण असते. कोणत्याही व्यक्तीला नागा साधू बनण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागतो असे म्हटले जाते.

Naga Sadhu : अशा प्रकारे होतो नागा साधूंचा अंत्यसंस्कार, हिंदू असूनही दिला जात नाही अग्नि
नागा साधूImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 15, 2023 | 4:11 PM
Share

मुंबई : नागा साधूंचे (Naga Sadhu) रहस्यमय जग सामान्य लोकांच्या विचारांच्या पलीकडे आहे. ते कुठून येतात आणि कुठे जातात हे नेहमीच लोकांसाठी एक रहस्य राहिले आहे. नागा साधू दिसायलाही सामान्य साधूंपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. विशेषतः कुंभमेळ्यामध्ये नागा साधू मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. नागा साधूंच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सर्वसामान्यांना माहिती नाही. यापैकीच एक म्हणजे नागा साधूंचे अंतिम संस्कार!

अशा पद्धतीने होतो नागा साधूंचा अंत्यसंस्कार

सामान्यतः हिंदू धर्मात कोणत्याही मानवाच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे दहन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह जाळले जात नाहीत. आता प्रश्न पडतो की नागा साधूही हिंदू धर्माचे पालन करतात मग त्यांचे मृतदेह का जाळले जात नाहीत.

असे म्हणतात की नागा साधूंचे जीवन खूप कठीण असते. कोणत्याही व्यक्तीला नागा साधू बनण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागतो असे म्हटले जाते. नागा साधू बनल्यानंतर ते गाव किंवा शहरातील गर्दीचे जीवन सोडून डोंगरावरील जंगलात राहातात. त्याचे निवासस्थान असे आहे की जेथे कोणी येत नाही.

Naga Sadhu (1)

असे म्हटले जाते की नागा साधूंमध्ये असामान्य शक्ती असते, ज्या ते कठोर तपश्चर्या करून प्राप्त करतात. या शक्तीचा ते कधीही गैरवापर करत नाही, असे म्हटले जाते की या शक्तीच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्या सोडवतो. यामुळेच कुंभमध्ये येणारे लोकं नागा साधूंना भेट देतात.

नागा साधू आपले संपूर्ण आयुष्य जंगलात किंवा डोंगरात घालवतात. त्याच्या मृत्यूनंतर, त्यांला भूसमाधी देऊन अंत्यसंस्कार केले जातात. नागा साधूंना आधी जलसमाधी दिली जात असे मात्र  नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने त्यांना भू समाधी देण्यात येते. नागा साधूंना सिद्धयोगाच्या आसनात बसून भू-समाधी दिली जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.