AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratiri upay : तुम्हीसुद्धा लावली असेल अखंड ज्योत तर नवव्या दिवशी अवश्य करा हा उपाय, लक्ष्मी राहील प्रसन्न

नवरात्रीच्या दिवसांत बहुतेक लोक अखंड ज्योत लावतात. अखंड ज्योत हे शुभ प्रतीक मानले जाते, लोकं त्यात जव, तांदूळ यांसारख्या धान्यांचाही समावेश करतात.

Navratiri upay : तुम्हीसुद्धा लावली असेल अखंड ज्योत तर नवव्या दिवशी अवश्य करा हा उपाय, लक्ष्मी राहील प्रसन्न
अखंड ज्योतImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 28, 2023 | 10:35 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात, नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, या दिवसात भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध विधी आणि उपाय करतात. (Navratri Upay) त्यामुळे देवी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या झोळी आनंदाने भरते. नवरात्रीमध्ये कलश मांडणे आणि अखंड ज्योत लावणे शुभ मानले जाते. जर तुम्हीही नवरात्रीला कलश स्थापित करून अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल आणि आता नवरात्रीनंतर ती कशी बंद करायची असा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला नवमीच्या दिवशी अखंड ज्योती संबंधी काही ज्योतिषीय उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सुख-समृद्धी प्राप्ती होईल, मग जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय.

अखंड ज्योतीचे हे उपाय करा

नवरात्रीच्या दिवसांत बहुतेक लोक अखंड ज्योत लावतात. अखंड ज्योत हे शुभ प्रतीक मानले जाते, लोकं त्यात जव, तांदूळ यांसारख्या धान्यांचाही समावेश करतात. यामुळे घरामध्ये  लक्ष्मी तसेच अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहतो. आता तुम्ही विचार करत आहात की या धान्यांचे काय करावे?  तुम्ही त्यांना लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.

अखंड ज्योतीची वात उरली असेल तर दिवा स्वतः विझत नाही तोपर्यंत जाळू द्या. अखंड ज्योतीचा दिवा स्वतः विझवणे शुभ मानले जात नाही. यामुळे तुमची पूजा खंडित होऊ शकते.

कलश आणि अक्षत यांचे काय करायचे?

चैत्र नवरात्रीला जर तुम्ही कलशाची स्थापना केली असेल तर तुम्ही कलशासोबत ठेवलेला तांदूळ मूर्तीसोबत विसर्जित करू शकता. याशिवाय तुम्ही ते  झाडाजवळ ठेवू शकता किंवा नदीत प्रवाहित करू शकता. किंवा पक्ष्यांना खायला ठेऊ शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.