AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात प्रत्येकजण तुमचा हितचिंतक नसतो, चाणक्य यांच्या या चार गोष्टी तुम्हाला शत्रूपासून वाचवतील

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. तुमचा खरा मित्र कोण? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

जगात प्रत्येकजण तुमचा हितचिंतक नसतो, चाणक्य यांच्या या चार गोष्टी तुम्हाला शत्रूपासून वाचवतील
chanakya nitImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 11:34 AM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये मैत्रीबाबत लिहिताना म्हणतात, या जगातील प्रत्येक व्यक्ती हा तुमचा हितचिंतक असू शकत नाही. जगात अनेकजण असे असतात जे केवळ स्वार्थासाठी तुमच्याशी मैत्री करतात. त्यांचा स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते तुमची साथ सोडतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं अन्यथा आयुष्यात पश्चतापाची वेळ येते. चाणक्य यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याच्या मदतीने आपण आपला खरा मित्र कोण आणि शत्रू कोण? हे ओळखू शकतो, तसेच शत्रूपासून सावध कसं राहायचं? हे देखील चाणक्य यांनी सांगितलं आहे.  चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आपली कमोजरी उघड करू नका – चाणक्य म्हणतात प्रत्येकजणाचा कोणता न कोणता विक पॉइंट असतो, मात्र त्याबाबत तुम्ही कोणाशीही कधीही बोलू नका. काण तुमचा मित्रही कधी कधी तुमचा शत्रू बनू शकतो. त्यामुळे कधीही आपली कमकुवत बाजू लोकांना सांगू नका.

विश्वास ठेवा पण डोळे झाकून विश्वास ठेवू नका – चाणक्य म्हणतात विश्वासावरच जग चालतं, त्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकता. मात्र कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिली आहे.

शांत राहा – चाणक्य म्हणतात शत्रू किंतीही बलवान असला तरी तुम्ही विचलित होऊ नका, शांत रहा. शांत राहून योजना बनवा तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

कमी बोला – चाणक्य म्हणतात अनेकदा आपण खूप जास्त बोलतो, आपल्या बोलण्यातून आपली रहस्य उघड होत असतात, त्यामुळे कमी बोला.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान