AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात प्रत्येकजण तुमचा हितचिंतक नसतो, चाणक्य यांच्या या चार गोष्टी तुम्हाला शत्रूपासून वाचवतील

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. तुमचा खरा मित्र कोण? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

जगात प्रत्येकजण तुमचा हितचिंतक नसतो, चाणक्य यांच्या या चार गोष्टी तुम्हाला शत्रूपासून वाचवतील
chanakya nitImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 11:34 AM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये मैत्रीबाबत लिहिताना म्हणतात, या जगातील प्रत्येक व्यक्ती हा तुमचा हितचिंतक असू शकत नाही. जगात अनेकजण असे असतात जे केवळ स्वार्थासाठी तुमच्याशी मैत्री करतात. त्यांचा स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते तुमची साथ सोडतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं अन्यथा आयुष्यात पश्चतापाची वेळ येते. चाणक्य यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याच्या मदतीने आपण आपला खरा मित्र कोण आणि शत्रू कोण? हे ओळखू शकतो, तसेच शत्रूपासून सावध कसं राहायचं? हे देखील चाणक्य यांनी सांगितलं आहे.  चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आपली कमोजरी उघड करू नका – चाणक्य म्हणतात प्रत्येकजणाचा कोणता न कोणता विक पॉइंट असतो, मात्र त्याबाबत तुम्ही कोणाशीही कधीही बोलू नका. काण तुमचा मित्रही कधी कधी तुमचा शत्रू बनू शकतो. त्यामुळे कधीही आपली कमकुवत बाजू लोकांना सांगू नका.

विश्वास ठेवा पण डोळे झाकून विश्वास ठेवू नका – चाणक्य म्हणतात विश्वासावरच जग चालतं, त्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकता. मात्र कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिली आहे.

शांत राहा – चाणक्य म्हणतात शत्रू किंतीही बलवान असला तरी तुम्ही विचलित होऊ नका, शांत रहा. शांत राहून योजना बनवा तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

कमी बोला – चाणक्य म्हणतात अनेकदा आपण खूप जास्त बोलतो, आपल्या बोलण्यातून आपली रहस्य उघड होत असतात, त्यामुळे कमी बोला.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर शेतकरी कर्जमाफी झाली! मंत्रिमंडळ बैठकीत थेट थेट मान्यता; वाचा...
अखेर शेतकरी कर्जमाफी झाली! मंत्रिमंडळ बैठकीत थेट थेट मान्यता; वाचा....
मोठी बातमी! मुंबईत पालिकेची धडक कारवाई! 50 वर्ष जुन्या अवैध दर्ग्यावर
मोठी बातमी! मुंबईत पालिकेची धडक कारवाई! 50 वर्ष जुन्या अवैध दर्ग्यावर.
पत्रकार पोलिसांचे काम करायला लागलेत; गुन्हेगारी दिसत नाही का?
पत्रकार पोलिसांचे काम करायला लागलेत; गुन्हेगारी दिसत नाही का?.
महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट... बंडखोरी शमवण्यासाठीच्या
महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट... बंडखोरी शमवण्यासाठीच्या.
अर्ज भरला, पण आता अडथळा! विक्रम काकडेंना निवडणुकीआधीच मोठा झटका
अर्ज भरला, पण आता अडथळा! विक्रम काकडेंना निवडणुकीआधीच मोठा झटका.
अपात्र महिलांकडून पैसे वसूल होणार का? फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर
अपात्र महिलांकडून पैसे वसूल होणार का? फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर.
मोठी बातमी! शिंदे गटातील नाराज अब्दुल सत्तार यांची उबाठाच्या अंबादास द
मोठी बातमी! शिंदे गटातील नाराज अब्दुल सत्तार यांची उबाठाच्या अंबादास द.
सरकारी तिजोरीचा अपहार? राऊतांच्या वक्तव्याने राजकारण ढवळून निघालं
सरकारी तिजोरीचा अपहार? राऊतांच्या वक्तव्याने राजकारण ढवळून निघालं.
सावधान! मोठ्या Gold Scam चा पर्दाफाश, सोनाराकडून भयंकर कांड, 133 जणांन
सावधान! मोठ्या Gold Scam चा पर्दाफाश, सोनाराकडून भयंकर कांड, 133 जणांन.
लाडकी बहीण योजनेतून नाव वगळलं? बावनकुळेंनी दिली मोठी गुड न्यूज!
लाडकी बहीण योजनेतून नाव वगळलं? बावनकुळेंनी दिली मोठी गुड न्यूज!.