AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jyotish Tips For Property: मालमत्तेचा वाद सुरू आहे? मग हे उपाय करून पाहाच

Jyotish tips for property: ज्योतिषशास्त्रात काही असे उपाय सांगितले गेले आहेत, जे तुम्ही केले तर तुमच्या जीवनातील मालमत्ता, प्रॉपर्टी, जमीनीचे विवाद तुम्ही बऱ्यापैकी दूर करू शकता. आम्ही तुम्हाला अशाच काही प्रभावी उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही अशा वादांवर मात करू शकता.

Jyotish Tips For Property: मालमत्तेचा वाद सुरू आहे? मग हे उपाय करून पाहाच
जीवनात मालमत्तेचे वाद सुरू आहेत? तर हे उपाय कराच
| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 11:39 AM
Share

Jyotish tips for property: जीवनात सुख-शांती आणि यश मिळवण्यासाठी (Success in life) लोक सर्व प्रकारचे प्रयत्न करतात. काही लोक स्वतःला यशस्वी तेव्हा समजतात जेव्हा त्यांच्याकडे स्वतःची मालमत्ता असते (Jyotish Tips For property) किंवा स्वतःचे छान घर असते. अनेकजण आपले घर (Home) बनविण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात. सेफ फ्युचरच्या दृष्टीने प्रत्येकालाच वाटते त्याच्याकडे काही जमीन, प्रॉपर्टी किंवा मालमत्ता असावी.

कधीकधी ते जमीन किंवा मालमत्ता, प्रॉपर्टी (Property) तर मिळवतात. पण, अशावेळी ते वादातही अडकतात. हा वाद हळूहळू इतका वाढतो की त्यात गुंतलेल्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवायला लागतो. यावादात लोकांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात किंवा मोठे नुकसानही सहन करावे लागते. अनेक प्रयत्न करूनही गोष्टी सुटत नसतील, तर ज्योतिषशास्त्राची मदत घेणं कधीही चांगलं. ज्योतिषशास्त्रात काही असे उपाय सांगितले गेले आहेत, जे तुम्ही केले तर तुमच्या जीवनातील मालमत्ता, प्रॉपर्टी, जमीनीचे विवाद तुम्ही बऱ्यापैकी दूर करू शकता. आम्ही तुम्हाला अशाच काही प्रभावी उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही अशा वादांवर मात करू शकता.

गायीला गूळ खाऊ घाला

हिंदू धर्मात गायीची सेवा करणे हे शुभ कार्य मानले जाते. जमिनीचा वाद दूर करण्यासाठी दर रविवारी गायीला गूळ खाऊ घाला. त्यासाठी दर रविवारी गोशाळेत जाऊन तपकीरी रंगाच्या गाईला गूळ खाऊ घालावा. गूळ खायला देताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. गाईला गूळ खाऊ घालताना तो गूळ तिच्या समोर फेकू नये. तुम्हाला हाताने गूळ गाईला द्यायचा भिती वाटत असाल तर गूळ एका जागी ठेवून गाईला खाऊ घालू शकता.पण, गूळ फेकू नका.

अन्न दान

सनातन धर्मात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीने दान केले तर त्याला त्याचे पुण्य तर लाभतेच, पण त्याला त्याच्या पापांपासून मुक्तीही मिळते. जमिनीवरून सुरू असलेला वाद तुमची डोकेदुखी बनला आहे आणि त्यातून सुटका हवी असेल तर अन्नदान करा. ज्योतिष शास्त्रानुसार यासाठी शुक्रवारी गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. गरिबांच्या आशीर्वादामुळे तुमचे दु:ख बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते.

दुर्गा देवीला प्रसन्न करा

जर तुम्हाला जमीन खरेदी-विक्री किंवा त्याच्याशी संबंधित इतर कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही दुर्ग देवीला शरम गेले पाहिजे. देवी दुर्गा प्रसन्न झाली आणि जर तिची कृपा झाली तर यापेक्षा चांगले काय असू शकते. ज्यांना जमिनीशी संबंधित वाद आहेत त्यांनी देवी दुर्गेच्या मंत्रांचा जप करावा. देवी मातेची आराधना करताना तिच्यासमोर तुमची समस्या सांगा. असे केल्याने तुमच्या जीवनात सुरू असलेला प्रॉपर्टी तसंच जमिनीचा वाद मिटण्याची शक्यता आहे.

हनुमानाची उपासना

संकट दूर करणार्‍या हनुमानजींची पूजा करूनही तुम्ही या समस्येवर मात मिळवू शकता. प्रत्येक मंगळवारी मंदिरात जाऊन काही उपाय करावे लागतात. यासाठी मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमानजींची पूजा करा आणि यादरम्यान हनुमान चालिसाचे पठण करा. शक्य असल्यास हनुमानजींना शेंदूर अर्पण करून त्यांना प्रसादाच्या वस्तू अर्पण करा आणि नंतर ते साहित्य गरिबांना दान करा.

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही.सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती इथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. )

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.